मुंबई - भारतीय जनता पक्षाचे धमकी व दहशतीचे राजकारण आता चालणार नाही. साम-दाम-दंड-भेद हे सत्ता असताना चालतात. सत्तेची गुर्मी खुर्ची गेल्यावर राहत नाही. शिवसेना अशा ब्लॅकमेलिंग व धमक्यांना भीक घालत नाही, अशा आक्रमक शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा हल्लाबोल केला.
शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेमार्फत बोलण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिले आहेत. त्यानुसार त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.
अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवेच, शिवसेनेचाच मुख्यमंत्री सुरुवातीला होणार, हा निर्धार शिवसेनेने कायम ठेवल्याचे राऊत या वेळी म्हणाले. सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी भाजपची आहे, त्यांनी राज्याला राष्ट्रपती राजवटीकडे नेऊ नये. घटनात्मक पेच निर्माण होईल असे काहीही करू नये.
राष्ट्रपती राजवट लावण्याची भाषा म्हणजे जनतेच्या मताचा अवमान असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भारतीय जनता पक्ष शिवसेनेसह इतर पक्षांतील आमदारांना फोडणार असल्याचे दावे निव्वळ फोल असल्याचे सांगताना ते म्हणाले, की एकही आमदार फुटणार नाही. ईडी, सीबीआयच्या खेळी आता जुन्या झाल्या आहेत. भाजपच्या अशा धमक्या व ब्लॅकमेलिंगला शिवसेना भीक घालत नाही, असे स्पष्ट करताना राऊत म्हणाले, की २०१४ ला फडणवीस यांनी घटनाविरोधी सरकार बनवले होते. या वेळी २०१४ सारखं घटनाविरोधी सरकार चालणार नाही. आता २०१९ ची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.