महाराष्ट्र

...तेव्हा सरसंघचालकांना खरा भारत समजेल 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : "ज्या दिवशी सरसंघचालक जगाच्या सर्व मनुष्यजातीप्रमाणे आपलीही जात आहे, जी जगाच्या इतर जातींप्रमाणेच विकसित झाली असे म्हणतील, त्या वेळी त्यांना खरा भारत समजेल,'' असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. 

दया पवार यांच्या "बलुतं' या आत्मकथनाच्या चाळिशीनिमित्त भरवलेल्या एक दिवसाच्या साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. "बलुतं'च्या निर्मितीचा इतिहास आठवताना कसबे यांनी वर्तमानाला हात घातला. ते म्हणाले, की "या देशातील सामान्य माणसाने आणि स्त्रियांनी जे हाल काढले, त्याची तुलना इतर देशांतील लोकांशी करता येत नाही. स्त्रियांवर येथे इतके अन्याय झाले, की त्याचे मोजमापही करता येत नाही. आपली महान संस्कृती वगैरे म्हणणे झूठ असून, आम्हीही जगातील मानवजातीतलेच एक होतो, हे आता सरसंघचालकांना कबूल करण्याची वेळ आली आहे. कारण परिस्थितीचा रेटा असाच आहे, की त्यांना ही सत्य परिस्थिती नाकारता येणार नाही.' 

ग्रंथाली प्रकाशन, दया पवार प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने हे संमेलन झाले. संमेलनाचे उद्‌घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कसबे यांच्या हस्ते झाले. "बलुतं'चे माहात्म्य सांगताना कसबे म्हणाले, की "इतिहास चमत्कारिक गोष्ट आहे. तुम्ही त्याच्यापासून पळून जाऊ शकत नाही आणि त्यामध्ये रममाणही होऊ शकत नाही. जे हिंदुत्ववादी इतिहासात रममाण झाले, त्यांचे हाल आपण बघतो. म्हणूनच तो समजून, त्यावर मात करून, त्याला ताब्यात घेऊन एक नवी समाजरचना निर्माण करण्याचे भान इतिहास देतो. हाच संदेश दया पवार यांच्या "बलुतं'ने समाजाला दिला.' 

कॉ. गावित यांना पुरस्कार 
ग्रंथाली आणि दया पवार स्मृती प्रतिष्ठानचा पहिला "बलुतं' पुरस्कार आदिवासी स्त्री लेखिका नजुबाई गावित यांना प्रदान करण्यात आला. दया पवार स्मृती पुरस्काराने अभिनेते सयाजी शिंदे, युवा लेखक राहुल कोसंबी आणि कवी आनंद विंगकर यांना गौरवण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT