महाराष्ट्र

शिष्यवृत्ती परीक्षेच्या नोंदणीत  तब्बल 44 टक्‍क्‍यांनी घट 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकडे गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी पाठ फिरवू लागले आहेत. दोन्ही परीक्षेसाठी होणारी नोंदणी गेल्या पाच वर्षांत तब्बल 44 टक्‍क्‍यांनी घटली आहे. यामुळे यंदा प्रथमच नोंदणीची मुदत 30 डिसेंबरपर्यंत वाढविण्याची वेळ परिषदेवर आली आहे. 

गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, या उद्देशाने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते; मात्र गेल्या पाच वर्षांत यात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटू लागली आहे. 2014 मध्ये दोन्ही इयत्ता मिळून 15 लाख 60 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती; तर 2019 मध्ये ही संख्या आठ लाख 60 हजारावर आली आहे. ही संख्या गतवर्षीपेक्षा अधिक असली तरी 2017 च्या तुलनेत ती खूपच कमी आहे.

विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झाल्याने नोंदणीची मुदत 15 नोव्हेंबरवरून 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यंदा ही परीक्षा 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. 

परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे, यासाठी संबंधित अधिकारी आणि शिक्षकांचे परिश्रम कमी पडत आहेत. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा पालकसभा घेऊन किंवा अन्य मार्गाने विद्यार्थी नोंदणी वाढवावी, असे आदेश परीक्षा परिषदेने दिले आहेत. जर विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची भीती वाटत असेल, तर त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित करावे, अशा सूचनाही परिषदेने दिल्या आहेत. यंदा बालभारतीने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी पुस्तकांची छपाई केली असून ते सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच यामध्ये प्रत्येक शाळेने सहभाग नोंदवावा, असेही परिपत्रकात म्हटले आहे. 

शिष्यवृत्तीमध्ये झालेली विद्यार्थी नोंदणी 
वर्ष - विद्यार्थी संख्या 
2014-15 : 15,69,525 
2015-16 : 15,94,289 
2016 मध्ये परीक्षा नाही झाली 
2017 - 9,49,299 
2018 - 8,58,465 
2019 - 8,66,131 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT