4Sakal_20_2854_29_2.jpg
4Sakal_20_2854_29_2.jpg 
महाराष्ट्र

दहावी-बारावीच्या परीक्षेवेळी सर्वच शिक्षकांची शाळा ! 'या' कारणामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीचा अडथळा असल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येणार आहेत. दहावीसाठी 16 लाख, तर बारावीसाठी 14 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रांची व वर्गखोल्यांची संख्या वाढणार असल्याने परीक्षेसाठी अतिरिक्‍त शिक्षकांची गरज भासणार आहे. त्यामुळे या काळात सर्वच माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना शाळेत हजर राहणे अनिवार्य केले जाणार आहे.

सोशल डिस्टन्सिंगमुळे वाढणार परीक्षा केंद्रे
दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्‍चित झाले असून विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईनच घेतली जाणार आहे. राज्यातील सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, पुणे, ठाणे, मुंबई, सातारा, जळगाव, अकोला यासह अन्य काही जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना कोरोनाचे संपूर्ण नियमांचे पालन काटेकोरपणे करावे लागणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांवेळी काही पेपर एकाच दिवशी येणार असल्याने त्या विद्यार्थ्यांची सोय स्वतंत्रपणे केली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांबरोबरच वर्गखोल्यांची संख्याही वाढणार असल्याने अतिरिक्‍त सुपरवायझरची (शिक्षक) गरज लागणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. यंदा 23 एप्रिलपासून बारावीच्या परीक्षेला तर 29 एप्रिलपासून दहावीच्या परीक्षेला सुरवात होणार आहे. तर बारावीचा शेवटचा पेपर 21 मे रोजी तर दहावीचा अंतिम पेपर 29 मे रोजी होणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने अमरावती, औरंगाबाद, नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाउन असतानाही परीक्षा असल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्यांना लॉकडाउनमधून सवलत देण्यात आली आहे. दुसरीकडे कोरोनाचा जोर आणखी वाढल्यास विद्यार्थ्यांना सोयीच्या ठिकाणी परीक्षा देण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीनेही नियोजन केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना शाळेतील उपस्थितीबाबत आदेश काढण्यात आले आहेत.

केंद्रप्रमुख, मुख्यापकांची कार्यशाळा
दहावी-बारावीच्या परीक्षांसंदर्भात 20 ते 31 मार्च या काळात नियोजन केले जाईल. तत्पूर्वी, केंद्रप्रमुख, उपकेंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कोरोनामुळे परीक्षा काळात वर्गखोल्या तथा केंद्रांची संख्या वाढल्यास अतिरिक्‍त मनुष्यबळाची गरज लागेल. त्यामुळे सर्वच माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना परीक्षा काळात शाळांमध्ये उपस्थित राहावे लागेल.
- भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT