Governor Bhagat Singh Koshyari sakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राबद्दल आपुलकी नसलेल्या राज्यपालांना दुसरीकडं पाठवा - काँग्रेस

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सध्या राज्यात मोठं वादंग निर्माण झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई शहराबद्दल अवमानकारक विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सध्या चहुबाजूने टीकेचा भडीमार होत आहे. त्यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही त्यामुळं त्यांना दुसरीकडं पाठवा अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे. (Send Bhagat Singh Koshyari send elsewhere Yashomati Thakur demands to President)

ठाकूर म्हणाल्या, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. या मुंबईत देशातील आणि जगभरातील लोक राहतात. मुंबईबाबत राज्यपालांनी केलेलं विधान महाराष्ट्रद्रोही आहे. मुंबईचं वर्क कल्चर पाहिलं तर इथं संकटकाळात लोक एकत्र येतात. महाराष्ट्रातील लोकं मोठ्या प्रमाणात इथं राहतात. त्यामुळं राज्यपालांना सातत्यानं महाराष्ट्रद्रोही विधानं करणं शोभत नाही.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्यानं महाराष्ट्रद्रोही विधानं करत आहेत. त्यामुळं ज्या व्यक्तीला महाराष्ट्राबद्दल आपुलकीच नाही त्याला इथं ठेवून काय फायदा? राष्ट्रपतींनी याचा विचार करावा, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagar Panchayat vs Municipal Council: डोकं फिरवणारं कन्फ्युजन! नगरपंचायत vs नगरपरिषद… नेमका फरक काय? सरळ भाषेत तुलना

Washing Towels Tips: दर आठवड्याला टॉवेल धुणे योग्य कि अयोग्य? जाणून घ्या एका क्लिकवर

Nashik Municipal Election : तीन वर्षांनंतर नाशिक जिल्ह्यातील ११ पालिकांच्या निवडणुका; महायुती-महाआघाडीचे काय होणार?

MCA Election Update : मतदार यादीतील घोळ समोर आल्यानंतर निवडणुकीला स्थगिती, उद्या हायकोर्टात होणार सुनावणी

Vidarbha Politics: विदर्भातील शहरी क्षेत्रावर प्रभाव कोणाचा?; भाजपा व काँग्रेसमध्येच खरी लढाई; दिग्गज नेत्यांचा कस लागणार..

SCROLL FOR NEXT