महाराष्ट्र बातम्या

Shahaji Bapu Patil: 'त्या' दोघांमुळे पडली ४० आमदार अन् उद्धव ठाकरे यांच्यात दरी; शहाजी पाटलांचा दावा

या दोघांसोबतच अजूनही दोघं-तिघं यासाठी कारणीभूत

सकाळ डिजिटल टीम

आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात दरी पडली, यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही राऊतांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर, या दोघांसोबतच अजूनही दोघं-तिघं यासाठी कारणीभूत आहेत अशी टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलीय. यावेळी बोलताना शहाजी बापू पाटील यांनी यावेळी थेट शिवसेना खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, "अंधेरी पोटनिवडणुकीची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसाठी सोडली आहे. या जागेवर युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडणूक लढवणार असून त्यांनी गेले तीन महिने काम केलेले असून त्यांना मागील निवडणुकीतही चांगली मतं पडली होती. त्यामुळे ही जागा भाजपला देण्यात आलीय.", बोलत असतानाच विजय मुरजी पटेल यांचाच अंधेरी पोटनिवडणुकीत विजय होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पुढे पाटील म्हणाले की, ज्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. तेव्हापासून राजकारणात वेगवेगळ्या प्रकारची गणित चालू झाली आहेत, आगामी काळात अजूनही वेगवेगळी गणितं आणि आराखडे बघायला मिळतील.", असंही शहाजीबापूंनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतासाठी दोन वर्षात एकही सामना खेळला नाही, आता थेट टी-२० विश्वकप संघात मिळाली संधी, कोण आहे तो खेळाडू?

Nashik Municipal Election : नाशिकच्या रणधुमाळीत तरुणांना 'अच्छे दिन'! निवडणुकीमुळे सोशल मीडिया हँडलर्सना मोठी मागणी

Dress Code: कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड सक्तीचा; राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या कपड्यांवर बंदी? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालला दोन मोठे महामार्ग प्रकल्प; पायाभूत सुविधांवर सरकारची मोठी गुंतवणूक

Mumbai News: मुंबईकरांना मोठा दिलासा! मढ ते वर्सोवा अवघ्या १० मिनिटांत पोहोचणार; केबल पूल लवकरच सुरु होणार

SCROLL FOR NEXT