Sharad Pawar News esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : हे घडवलं जातंय! संगमनेर, कोल्हापूरच्या घटनांवरून पवारांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

रोहित कणसे

संगमनेर आणि कोल्हापूर येथे झालेल्या दंगलीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांनी अशा प्रकारांना सत्ताधारी पक्षाकडून प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप देखील केला आहे. संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषजदेत पवार बोलत होते.

राज्यत तसेच देशात दंगली रोखण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीयेत का? याबद्दल विचरण्यात आलेल्या प्रश्नाला शरद पवारांनी उत्तर दिलं. संगमनेर आणि कोल्हपूर दंगली विषयी बोलताना पवार म्हणाले की, सकाळी नगरमध्ये संगमनेर येथे काहीतरी झालं अशी बातमी पाहिली. त्यानंतर कोल्हापूरला कुणीतरी मोबाइलवर मेसेज पाठवला, तो चुकीचा असेलही, नाही असं नाहू, पण म्हणून लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही. आज सत्ताधारी पक्ष अशा गोष्टींना प्रोत्साहित करतो.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, राज्यकर्त्यांची जबाबदारी शांतता आणि सुव्यवस्था निर्मण करणे आहे. राज्यकर्ते आणि त्यांचे सहकारीच रस्त्यावर येऊ लागले आणि त्यामुळे दोन गटांमध्ये कटूता निर्माण होत असेल तर ही काही चांगली गोष्ट नाही असे शरद पवार म्हणाले. राज्यकर्त्यांचं लक्ष पायाभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज, आरोग्य शैतक्षणिक सुविधा यांच्यावर अधिक असायला हवे असेही शरद पवार म्हणाले.

मर्यादित भागाच झालं असेल तर चांगली गोष्ट आहे. पण हे घडवलं जात आहे. आज सकाळी टीव्हीवर पाहिलं कोणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवला त्यासाठी पुण्यात दंगल करण्याचं काय कारण आहे? पुण्यात आंदोलन करण्याचं काय कारण आहे? औरंगजेबाचा फोटो दाखवला म्हणून काय परिणाम होतो मला कळत नाही, असेही शरद पवार म्हणाले.

एकेरी उल्लेखावर पवारांची प्रतिक्रिया

पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील काही भाजपचे नेते तुमचा एकेरी भाषेत उल्लेख करत आहेत, यावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी दोनच शब्दात हा विषय संपवला. ठिक आहे, कशाला महत्व देताय इतकंच उत्तर पवारांनी दिलं.

संगमनेर अन् कोल्हापूरात काय झालं

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये ६ जून, मंगळवार रोजी सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या भगवा मोर्चानंतर परिस्थिती चिघळल्याचं पाहायला मिळालं होतं. या मोर्चावर समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली होती. त्यामुळे संगमनेरच्या सामनापूर गावात दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाला होता. तर कोल्हापूरात काल तरुणांनी व्हाट्सअॅपवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक देखील झाली. यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT