Sharad Pawar news
Sharad Pawar news esakal
महाराष्ट्र

'तेव्हा 'न्यू बेळगाव'चा प्रस्ताव मांडला होता'; कर्नाटक निवडणूकीपूर्वी शरद पवारांचा पुस्तकातून गौप्यस्फोट

रोहित कणसे

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. आगामी कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सीमावादाबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांचे लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले आहे. या पुस्तकात शरद पवारांनी अनेक घडामोडींवर प्रकाश टाकला आहे.

या पुस्तकातच शरद पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील सीमाप्रश्न सोडवण्यासाठी न्यू बेळगाव चा प्रस्ताव मांडला होता अशी खळबळजनक माहिती दिली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेली ६३ वर्षं भिजत असतानाच मुंबई केंद्रशासित होणार असल्याची चर्चा तितकीच जुनी आहे. मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढावी, असं दिल्लीतल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही, हे मी जबाबदारीनं सांगू शकतो, असेही शरद पवार त्यांच्या पुस्तकात म्हणाले आहेत.

दरम्यान सीमाप्रश्नाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र प्रश्न भिजत पडण्यापेक्षा त्यावर सर्वमान्य आणि किमान समाधानकारक तोडगा काढायला हवा असेही पवार यावेळी म्हणतात.

पुढे त्यांनी लिहीलं की, सीमावादावर एक तोडगा मी सुचवला होता. बेळगाव महाराष्ट्राला मिळायला हवं, ही आपली इच्छा होती आणि आहे. तिथल्या मराठी माणसालाही महाराष्ट्रात येण्याची तीव्र इच्छा आहे. त्या दृष्टीनं मी 'न्यू बेळगाव'चा प्रस्ताव मांडला होता, असे शरद पवारांनी लिहीलं आहे.

त्यांनी पुढे या योजनेविषयी सविस्तर माहिती देखील दिली आहे. योजना अशी, की महाराष्ट्राच्या हद्दीत कर्नाटक सीमेपासून चौदा किलोमीटर अंतरावर सिडकोनं एक उपनगर विकसित करावं. तिथे मराठी शिक्षणाची सोय करावी, राज्याच्या सर्व योजना इथे राहणाऱ्यांना लागू कराव्यात. मराठी माणसांनी त्यांचा व्यापारउदीम, नोकऱ्या बेळगावात करायला हरकत नाही. बेळगावमधली त्यांची निवासस्थानं न सोडताही त्यांना महाराष्ट्रात स्थायिक होण्याची संधी देणारी ही योजना होती. मराठीशी त्यांची नाळ राहावी आणि महाराष्ट्रात राहण्याची भावना प्रत्यक्षात यावी, या दृष्टीनं योजना आखली होती, असे शरद पवार म्हणालेत.

या प्रस्तावाला महाराष्ट्रातल्या बहुसंख्य नेत्यांनी पाठिंबा दिला होता. फार गवगवा न करता, योजना अमलात आणा, असा त्यांचा आग्रह होता. अगदी शिवसेनेलाही हा प्रस्ताव मान्य असला, तरी त्याला जाहीरपणे मात्र विरोधच करणार, असं त्या वेळी मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या वतीनं स्पष्ट केलं होतं.

याच्या विरोधात सूर फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीचे किरण ठाकूर यांचा होता. 'आम्हाला 'मोडकंतोडकं बेळगाव नको,' अशी भूमिका त्यांनी घेतली होती. या प्रयत्नानंतर हा विषय अद्याप कोणताही तोडगा न निघता भिजत घोंगड्यासारखा पडला आहे, असेही शरद पवार पुस्तकात म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT