Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Eknath Shinde vs Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र

Shivsena : 'मन मोठं करून जसं शिवाजी पार्क दिलं तशी सत्ताही द्या'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दसरा मेळाव्याबद्दल उत्सुकता शिगेली पोहचली असून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा बीकेसी मैदाणावर होणार आहे. यादरम्यान आग्रह धरला असता तर आम्ही शिवतीर्थ मिळवले असते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, त्यांच्या या विधानाला शिवसेनेकडून खोचक शब्दात उत्तर दिले आहे.

राज्यात दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवेसना एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान शिवतीर्थावर शिवसेनाचा तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाता दसरा मेळावा होणार आहे. यापूर्वी शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गट कोर्टात देखील गेले होते. यानंतर मुंबई हायकोर्टाने शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी दिली आणि त्यानंतर शिंदे गट सुप्रिम कोर्टात जाणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान यानंतर शिवाजी पार्क बद्दल एकनाथ शिंदे म्हटले होते की, आग्रह धरला असता तर आम्ही मिळवले असते. यावर शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या की एकनाथ शिंदे यांनी मन मोकळं ठेवावं आणि शिवसेनेला सत्ता देऊन टाकावी.

दसरा मेळावा निमित्त आदिशक्तीचा जागर होण्यासाठी बये दार उघड ही मोहीम ६ जिह्यात शिवसेना युवासेना कडून राबवण्यात आली आहे. या मोहिमेचा वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधणे हा त्याचा हेतू होता. सर्व शक्तीपीठांच्या ठिकणी आम्ही भेट दिली अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी दिली. राज्यात महिला सुरक्षा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे असेही त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना त्यांनी शिंदे गटावर टीका देखील केली आहे, त्या म्हणाल्या की, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे चारित्र्य हनन करायचे हे षडयंत्र त्यांनी आखलेली आहे. रोजगार संदर्भात वेदांत प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यात आले, आदित्य ठाकरे हे असत्य सांगत आहेत असे त्यांच्यावर आरोप झाले असेही त्या म्हणाल्या .

शिवसेना मेळावा अदभुत होईल

दोन्ही मेळाव्यात स्पर्धा आहे. दसरा मेळावा आमचा सांस्कृतिक वारसा आहे. यंदाचा शिवसेना मेळावा अदभुत आणि वाजत गाजत होईल असेही त्यांनी सांगितले. तसेच अनेक ठिकाणी आम्ही जाऊन आलो असता तिथे अनेक जणांच्या तक्रारी होत्या. रोजगाराचा विषय होता असे त्या म्हणाल्या.

तिघांनाच भाजप ने रोजगार दिला

आत्तापर्यंत फक्त नारायण राणे, नवनीत राणा आणि किरीट सोमय्या या तिघांनाच भाजप ने रोजगार दिला आहे. पूर्वीचे नारायण राणे आता वेगळे दिसायला लागले आहेत. खूप बदल त्यांच्या चेहऱ्यात आणि विचारत झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या वर बोलले नाहीत तर त्यांना कोणी प्रसिद्धी देत नाहीत असे त्या म्हणाल्या. तसेच मिलिंद नार्वेकर कुठे ही जाणार नाहीत. त्यांचे स्पष्टीकरण ते त्यांच्या कामातून देतील असा विश्वास देखील गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केला. प्रेमाची आणि विश्वासाची लाट येत्या काही दिवसात शिवसेनेत दिसेल असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT