Shivaji Maharaj statue Rajkot Fort Jaideep Apte Ramdas Athawale. Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Athawale On Jaydeep Apte: "ती चूकच होती..." जयदीप आपटेला शिवरायांच्या पुतळ्याचे काम दिल्याने रामदास आठवलेंचा संताप

Shivaji Maharaj statue Rajkot: महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याआधी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना घडल्याने राज्यात जोरात राजकारण सुरू आहे. (Ramdas Athawale On Jaydeep Apte)

आशुतोष मसगौंडे

राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे बांधकाम अननुभवी शिल्पकार जयदीप आपटेकडे सोपवणे ही चूक होती, असे केंद्रीय मंत्री आणि एनडीएचे सहयोगी रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मालवण तालुक्यातील गडाला भेट दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांकडे केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, अनुभवी शिल्पकारांची कमतरता नाही, नवशिक्याकडे जबाबदारी का देण्यात आली? सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नौदलाच्या संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे. आता विरोधकांनी या घटनेचे राजकारण करू नये, असेही आठवले म्हणाले.

या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याआधी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना घडल्याने राज्यात जोरात राजकारण सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पुतळा पडल्यानंतर विरोधी पक्ष महाराष्ट्र सरकारवर आरोप करत आहेत. विरोधकांच्या आरोपानंतर सर्वात आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यातील जनतेची माफी मागितली. तरही याबाबतचा जनता आणि विरोधकांमधील संताप कमी झालेला नाही.

26 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदल दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. नौदल दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून 35 फुटांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.

मराठा नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी संरक्षण आणि सुरक्षेच्या वारशाचा आणि आधुनिक भारतीय नौदलाशी त्यांचे ऐतिहासिक संबंध यांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. त्यासाठी राज्य सरकारने निधीही दिला होता.

अहवालानुसार, या पुतळ्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2.36 कोटी रुपये खर्च केले होते.

दरम्यान या प्रकरणानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी काल मुंबईमध्ये सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन केले होते. या आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे, शाहू महाराज, पृथ्वीराज चव्हाण आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.

दुसरीकडे भाजपने महाविकास आघाडीच्या या आंदोलनाला विरोध करत मुंबईतील विविध भागांत निषेध व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT