shivrajyabhishek  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivrajyabhishek 2025: शिवराज्याभिषेका मागे उद्दिष्ट काय होते? शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी कोणती स्वप्ने पाहिली होती

Significance of Shivrajyabhishek in Indian History : आज रायगड किल्ल्यावर भव्य असा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Kiran Mahanavar

Shivrajyabhishek Sohala 2025 : आज ६ जून म्हणजे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर झाला आणि मराठा साम्राज्याला खर्‍या अर्थाने सुरू झाली. नंतर याच मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडा लावला.

शिवराज्याभिषेकाचे महत्व सांगताना जेष्ठ इतिहास संशोधक 'वा.सी. बेंद्रे' आपल्या 'श्रीशिवराजाभिषेक' ग्रंथात लिहतात कि, छत्रसिंहासनाच्या धर्मसिद्ध प्रतिष्ठेने हिंदवी राज्यसंस्थेला सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक श्रेष्ठ दर्जा व स्थैर्य प्राप्त होण्याचे उद्दिष्ट या राज्याभिषेकामागे होते.

" राज्याभिषेक हा एक संस्कार आहे, तो आवश्यक आहेच परंतु केवळ राज्याभिषेक हि स्वराज्याची फलश्रुती नव्हे. अॅबे कॅरे हा फ्रेंच प्रवासी शिवकाळात हिंदुस्थानात येऊन गेला. चौल बंदरानजीक त्याचे एका मराठा अधिकाऱ्याशी जे संभाषण झाले ते त्याने त्याच्या प्रवासवर्णनात लिहून ठेवले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा स्वतंत्र राज्याची घोषणा केली नव्हती. पुढे जस जस स्वराज्य वाढू लागले तेव्हा शत्रू कट रचू लागले. मुघल गोरगरीब जनतेवर अन्याय करू लागले ,आया बहिणीची विटंबना मोठ्या प्रमाणात वाढली. साधुसंताची अवहेलना होऊ लागली हे सगळे दुषित वातावरण नीट करण्यासाठी स्वराज्य स्थिर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतंत्र राजा म्हणून घेणं गरजेच होतं.

त्यासाठी मग राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व सहकारी यांनी राज्याभिषेक सोहळ्याचं प्रयोजन आखलं. एका बखरीत 'महाराजांचा प्रताप दिवसेंदिवस वाढत चालला असे जाणून छत्र सिंहासन करावे, राज्याभिषेक करावा, असा सर्वांचा मनोदय जाहला', असा उल्लेख आढळतो.

राज्याभिषेक करून घेण्यामागे मुख्य दोन उद्दिष्ट होते.

1) छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाने राजा म्हणून मान्यता मिळणार होती.

2) आणि सर्वच शत्रूंना छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून स्वीकारावेच लागणार होते. वेदमूर्ती गागाभट्टांनी शिवाजीराजांचा राज्याभिषेक केला आणि छत्र धारण केले, नाणी पाडणे आणि नवीन शक सुरू करणे ही सार्वभौमत्वाची तिन्ही चिन्हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अंमलात आणली. राज्याभिषेकावेळी राज्यव्यवस्थेत महत्वाचे बदल करण्यात आले. आणि त्यानंतर स्वराज्याचा कारभार सुरू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT