महाराष्ट्र

'महाविकासआघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही'

वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात सरकार स्थापनेवरून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आता महाविकासआघाडीची स्थापना करण्यात आली आहे. या महाविकासआघाडीकडून सरकार स्थापन केले जाण्याची शक्यता आहे. असे असताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत वक्तव्य केले. महाविकासआघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका गडकरी यांनी केली. 

महाविकासआघाडीच्या सरकारबाबत नितीन गडकरी म्हणाले, राज्यातील नवे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थिर राहणार नाही. हे सरकार महाराष्ट्राच्या भल्याचे नाही. अस्थिर सरकार आल्यास महाराष्ट्राचे सर्वाधिक नुकसान होईल. भाजप-शिवसेना युती हिंदुत्त्वाच्या विचारधारेवर आधारित होती. आजही आमच्यात वैचारिक मतभेद नाहीत. मात्र, अशी युती तोडणे म्हणजे केवळ देशाचेच नव्हे तर हिंदुत्त्व आणि महाराष्ट्राचे नुकसान आहे. 

महाविकासआघाडी संधीसाधू आघाडी

महाविकासआघाडी ही एक सत्तेसाठी बनवलेली संधीसाधू आघाडी आहे. याचबरोबर, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे हे सरकार आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही.

शिवसेनेच्या विचारांशी काँग्रेस सहमत नसेल

शिवसेनेच्या विचारांशी काँग्रेस कधीही सहमत नव्हती आणि नसेल. त्याचबरोबर काँग्रेस ज्या विचारांवर बनलेला पक्ष आहे, ते विचार शिवसेनेला मान्य नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT