Shivsena Podcast Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Podcast : मोदींना ३६ पक्षांची गरज काय? ED-CBI-IT पुरेसं; उद्धव ठाकरेंचा एनडीएवर हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी 'इंडिया' नावाची आघाडी स्थापन केली. त्याचदिवशी केंद्रातील मोदी सरकारने अनेक वर्षांनंतर एनडीएची बैठक बोलवली होती. या बैठकीत एनडीएचे ३८ राजकीय पक्ष सोबत आले होते. यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या आठवड्यात बऱ्याच वर्षानंतर एनडीए नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं. देशभक्त विरोधकांनी तयार केलेल्या इंडिया नावाच्या आघाडीला उत्तर देण्यासाठी पंतप्रधानांना आठवणीतील गोष्टी आठवल्या. त्यासाठी त्यांनी एनडीएतील ३६ पक्षांची जेवणावळ घातली.

खरं तर ३६ पक्षांची गरज नाही. त्यांच्या ईडी, इन्कमटॅक्स आणि सीबीआय तीन पक्ष मजबूत आहेत. अनेक पक्षांचा एकही खासदार नाही. आपल्यातले काही गद्दार तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने एनडीएमध्ये तीनच पक्ष शिल्लक राहिलेले आहेत, असंही उद्धव यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातावरही भाष्य केलं. त्या अपघातातील मृतांच्या चिता पेटलेल्या असताना हे शपथविधी करत होते. संवेदनाच राहिल्या नाही. यावर प्रतिक्रिया देण्यास शब्दच नाही. आता शेवटची आशा राहिली ती जनतेकडूनच. हे देश त्यांचा आहे. अनेक क्रांतीकारकांनी बलिदान देऊन देश उभारला. देश म्हणजे, माणसे आहेत. याच देशाला वाचविण्यासाठी इंडिया ही आघाडी उभी राहिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT