Atal Bihari Vajpayee Sharad Pawar
Atal Bihari Vajpayee Sharad Pawar esakal
महाराष्ट्र

'शरद पवारांचा तो शब्द अन् अवघ्या 1 मतानं वाजपेयी सरकार कोसळलं'

सकाळ डिजिटल टीम

शरद पवारांच्या सांगण्यावरून रामशेठ ठाकुरांनी 'ते' मत बाजूला दिलं होतं.

सातारा : रामशेठ, तुमचं सामाजिक कार्य अलौकिक आणि तितकंच महत्वाचंही आहे. जनतेला तुमची राजकीय कारकिर्द देखील माहितीय, असं म्हणत तुमच्यामुळं एका 'रामभरोसे' पंतप्रधानाला पायउतार व्हावं लागलं, असा किस्सा खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी आज साताऱ्यात रामशेठ ठाकूर यांच्याबाबत सांगितला. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा (Satara) छत्रपती शिवाजी काॅलेजच्या (Chhatrapati Shivaji College) नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) साताऱ्यात आलेत.

या कार्यक्रमास रयत संस्थेचे संचालक रामशेठ ठाकूर (Ramsheth Thakur), कार्याध्यक्ष डाॅ. अनिल पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. कार्यक्रमादरम्यान खासदार पाटील यांनी रामशेठ ठाकूर यांच्याबाबत घडलेला एका किस्सा सांगितला. ते म्हणाले, रामशेठ ठाकूर यांच्या एका निर्णयक मतामुळं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना (Atal Bihari Vajpayee) पायउतार व्हावं लागलं होतं. त्यावेळी शरद पवारांच्या सांगण्यावरून, रामशेठ ठाकुरांनी मत बाजूला दिल्यानं हे घडल्याचं खासदार पाटलांनी नमूद केलं.

पाटील पुढे म्हणाले, रामशेठ ठाकूर हे शेकाप पक्षात होते. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरुन रामशेठ ठाकुरांनी त्यांचं मत बाजूला दिलं आणि सन 1999 कालावधीत तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं सरकार कोसळलं, ही आठवण खासदार पाटलांनी कार्यक्रमात ताजी केली आणि तिथं उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवून त्या किस्याला दाद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT