Sinar Mas Pulp and Paper company investing 10500 crores rupee in raigad maharashtra says devendra fadanvis  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Investment in Maharashtra : रायगडमध्ये येणार १०,५०० कोटींची गुंतवणूक! फडणवीसांनी केली घोषणा

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपासून अनेक उद्योग प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सिनार मास पल्प अँड पेपर गी कंपनी राज्यात 10, 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

दरम्यान या गुंतवणूकीतून 7 हजार रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रायगड जिल्ह्यात 900 हेक्टरवर हा प्रकल्प उभा राहणार असल्याचे देखील फडणवीसांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सिनार मास पल्प अँड पेपर प्रा. लि. कंपनीला जागा वाटप देकारपत्र देण्यात आले. शिंदे यांनी सांगितले की, मे. सिनार मास पल्प अँड पेपर कंपनीला रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे पहिल्या टप्प्यासाठी 287 हेक्टर जमिनीचे वाटपपत्र दिलं आहे. या उद्योगातून सात हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

कंपनीला जागा वाटप देकारपत्र देण्यात आले. त्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मे. सिनार्मस पल्प अँड पेपर कंपनीचे संचालक सुरेश किल्लम, कंपनीचे भारतातील प्रमुख सिद्धार्थ फोगट आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT