Maharashtra Assembly Session Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Assembly Session: राष्ट्रवादीसाठी विधिमंडळात एकच कार्यालय; अजित पवार गट अन् शरद पवार समर्थक आमदार एकत्र बसणार?

विरोधक आक्रमक होणार की सत्ताधारी वरचढ ठरणार? आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

अंकिता खाणे (Ankita Khane)

Maharashtra Politics : शिवसेनेच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सत्तेत आल्याने सत्ताधारी वरचढ ठरणार, की विरोधक वरचढ ठरणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक गोष्टींवरून कोंडीत पकडू शकतात. राज्यात पुरेसा पाऊस न झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी, महागाई यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.(Latest Marathi News)

अशातच आता सत्तेतही राष्ट्रवादीचे नेते आहेत तर विरोधक म्हणूनही राष्ट्रवादीचे नेते असणार आहेत. तर विधिमंडळातील राष्ट्रवादी कार्यालयात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गट याना वेगळेवेगळे कार्यालय देण्यात आले नाहीत. पक्ष कार्यालय पहिलेच असून त्यात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. तर दरवाजावर विधानसभा प्रतोद अनिल पाटिल यांच्या नावाची पाटी आहे.(Latest Marathi News)

राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर काही आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर काही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. अशातच विधिमंडळातील राष्ट्रवादी कार्यालयात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांना वेगळेवेगळे कार्यालय देण्यात आले नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूचे नेते एकत्रित बसणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.(Latest Marathi News)

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. हे अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सभागृहातले चित्र कसे असणार? राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांना धारेवर धरणार? याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. सकाळी 11 वाजता विधानसभा तर दुपारी 12 वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.(Latest Marathi News)

तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर कोणत्या गटाकडे किती आमदार आहेत हे समोर आलेलं नाही. अजित पवार गटाने आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर जयंत पाटील यांनी आमच्याकडे 19 आमदार असल्याचे म्हटले आहे.तर 9 मंत्री वगळता इतर आमदारांची विरोधी पक्षात बसण्याची व्यवस्था करावी असं पत्र जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. त्यामुळे कोणाच्या गटात किती आमदार हे आज स्पष्ट होणार आहे. जितेंद्र आव्हाडांनी व्हीप जारी केला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

SCROLL FOR NEXT