bombay-high-court 
महाराष्ट्र बातम्या

केवळ भिकाऱ्यांना दोष कशाला : उच्च न्यायालय

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - सुसंस्कृत लोकदेखील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सुरक्षा तत्त्वांचे पालन करीत नाहीत, मग केवळ भिकाऱ्यांनाच दोष कशाला, असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी उपस्थित केला.

रस्त्यावरील भिकारी मास्क न वापरता लोकांच्या जवळ येतात, सुरक्षित अंतर ठेवत नाहीत आणि त्यांच्यामुळे कोव्हिड १९ चा संसर्ग वाढत आहे, असा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. पुण्यातील नागरिक ज्ञानेश्‍वर दारवतकर यांनी ॲड. शेखर जगताप यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये आज सुनावणी झाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनेक महिला, लहान मुले बेशिस्तपणे भीक मागत असतात, त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक संभवतो. तरी राज्य सरकारने यावर योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी याचिकादाराने केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र संपूर्ण देश कोरोनामुळे त्रस्त झाला आहे आणि कठीण प्रसंगातून जात आहे. केवळ भिकाऱ्यांना दोष कशाला द्यायचा, असा प्रश्‍न खंडपीठाने याचिकादाराला केला. शिकलेले सुसंस्कृत लोकही नियमांचे पालन करीत नाही, मग फक्त भिकाऱ्यांना दोष देणे चूक आहे, त्यामुळे संवेदनशील भूमिका घ्या, असे खडे बोल न्यायालयाने ऐकवले.

राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने याचिकेत उपस्थित मुद्द्यांवर खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी ता. १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

(Edited by : Kalyan Bhalerao)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT