महाराष्ट्र

पुण्याच्या पावसावर सोलापूरच्या "उजनी'ची मदार 

संतोष सिरसट

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात असलेले उजनी धरण भरण्यासाठी पुणे जिल्ह्यात मोठा पाऊस पडणे अपेक्षित असते. पुण्याच्या पावसावरच उजनी धरणाची मदार आहे. यंदा उजनी धरण परिसरातच चांगला पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वजामधून अधिक झाली आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस असल्याने त्याठिकाणाहून उजनीत पाणी आलेले नाही. त्यामुळेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठा कमीच असल्याचे दिसून येते. 

उजनी धरणाकडे सोलापूरसह पुणे, नगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही लक्ष लागलेले असते. धरण कधी एकदा शंभर टक्के भरते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात. एकदा धरण भरले म्हणजे वर्षभराची पाण्याची भ्रांत संपून जाते. धरण भरल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसू लागतो. त्यामुळे धरण कधी भरणार याकडे त्यांचे लक्ष लागलेले असते. 
पुण्यातील भामा-आसखेड, पवना, टेमघर, पानशेत, खडकवासला या धरणाचा पाणीसाठा अद्यापही 30-40 टक्‍यांच्या आसपासच आहे. पुणे जिल्ह्यात पाऊस पडल्याशिवाय ही धरणे भरणार नाहीत व पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्याशिवाय उजनीत पाणी येणार नाही हे समीकरण सरळ आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुणे जिल्ह्यात पाऊस पडावा म्हणून देव पाण्यात घालत आहेत. मागील वर्षी या काळात पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. त्या पावसाच्या जोरावरच उजनी धरणाचा पाणीसाठा आजअखेर जवळपास 33 टक्के इतका झाला होता. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात सुरवातीच्या काळात पाऊसच झाला नव्हता. तरीही पुण्याच्या पावसावर धरण शंभर टक्के भरले होते. पण, यंदा ती स्थिती राहिली नसल्याचे दिसू लागले आहे. 


 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'डायल 108' अ‍ॅम्ब्युलन्स प्रोजेक्ट कंत्राट प्रकरण तापणार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

SCROLL FOR NEXT