सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा पार पडल्यानंतर आता निकालासाठी परीक्षा विभागाची दमछाक होत आहे. तीन लाखांपैकी अजूनही साधारणत: एक लाख उत्तरपत्रिका तपासायच्या शिल्लक असून निकाल वेळेत लागण्यासाठी त्या वेळेतच तपासाव्या लागणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाने प्राध्यापकांना पत्रव्यवहार करून उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढवून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
सत्र परीक्षेचा निकाल वेळेत जाहीर व्हावा, यासाठी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, सर्व अभ्यासक्रमांचे अधिष्ठाता, परीक्षा नियंत्रक हे सर्व वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करीत आहेत. दररोज विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांना व प्राध्यापकांच्या ते संपर्कात आहेत. याशिवाय अधिष्ठातांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्याद्वारे देखील पाठपुरावा केला जात आहे. सध्या पारंपारिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ऑफलाइन तपासल्या जात असून सध्या ८५ टक्क्यांपर्यंत तपासणी पूर्ण झाल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकाल मात्र विलंबाने लागतील, कारण आतापर्यंत बीए-आर्किटेक्चर या एकाच अभ्यासक्रमाचा निकाल लागला आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने पेपर तपासणाऱ्या प्राध्यापकांना निकालास विलंब होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण कराव्यात, अशी पत्रे पाठविली आहेत. कारण, निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना गुणासंदर्भात आक्षेप आहे, त्यांना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी घेऊन पुनर्मूल्यांकनासाठी १५ दिवसांचा वेळ द्यावा लागणार आहे.
२८ फेब्रुवारीपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील
आतापर्यंत विद्यापीठाने सत्र परीक्षेनंतर दहा अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या काही दिवसांत लावले आहेत. प्राध्यापकांच्या सहकार्यामुळे काही निकाल २५ दिवसांतच जाहीर केले आहेत. आता उर्वरित अभ्यासक्रमांचे निकाल साधारणत: २८ फेब्रुवारीपर्यंत लागतील, असा विश्वास आहे.
- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
विद्यापीठाची सद्य:स्थिती
संलग्नित महाविद्यालये
१०९
एकूण विद्यार्थी
७२,०००
एकूण उत्तरपत्रिका
३,०००००
तपासलेल्या अंदाजे उत्तरपत्रिका
२,०००००
तपासणी राहिलेल्या उत्तरपत्रिका
१,०००००
पुढील सत्र परीक्षा एप्रिलमध्ये...
डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान विद्यापीठाची सत्र परीक्षा पार पडली असून सध्या त्याचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहेत. आता २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन विद्यापीठाकडून केले जात आहे. निकाल वेळेत लावून शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनपूर्वी व्हावी असा त्यामागील हेतू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.