state board maharashtra google
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी

इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा, मूल्यमापन आणि निकाल ही सर्व कामे ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत.

नमिता धुरी

पुणे : इयत्ता नववी ते दहावी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा संपवून ३० एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करण्याची सूचना 'राज्य शिक्षण मंडळा'ने शाळांना दिली आहे. उष्णतेची तीव्र लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर ही सूचना देण्यात आली आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा, मूल्यमापन आणि निकाल ही सर्व कामे ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत. तसेच उन्हाळी सुट्टी २ मे ते १२ जून या कालावधीत असणार आहे. २०२२-२३ हे नवे शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार आहे. अलीकडे महाराष्ट्रातील उन्हाळा अधिकाधिक तीव्र होत असल्याने विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे.

यापूर्वी इयत्ता दहावी आणि बारावीच्या शालांत परीक्षा राज्य शिक्षण मंडळाने यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. या दोन्ही परीक्षांच्या निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरीही, मे आणि जूनमध्ये हे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT