मुंबई - गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाकडून राहणीमान निर्देशांक सर्वेक्षणांतर्गत वास्तव्यासाठी सर्वोत्तम शहरांचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात देशातील अन्य शहरांसह मुंबईनेही सहभाग घेतला आहे. परंतु, मागील 26 दिवसांत केवळ १४ हजार मुंबईकरांनी मत नोंदविले. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत मुंबई मागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने १ फेब्रुवारीला सुरू केलेले सर्वेक्षण 29 फेब्रुवारीला समाप्त होईल. त्यासाठी मुंबई महापालिका ‘नोडल एजन्सी’ म्हणून कार्यरत आहे. मुंबईतील नागरिकांकडून मिळालेली माहिती संकलित करून सरकारच्या ऑनलाइन पोर्टलवर सादर करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात नागरिकांचे त्यांच्या शहराबद्दलचे मत नोंदविले जात आहे. त्याचप्रमाणे थेट मुलाखतींद्वारेही नागरिकांचा प्रतिसाद नोंदवून घेतला जात आहे. या सर्वेक्षणात आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध मुद्द्यांचा समावेश आहे. शिक्षणविषयक सुविधा, आरोग्यसेवा, महिलांची सुरक्षा, वाहतूक यंत्रणा, रोजगाराच्या संधी, घरे, स्वच्छता, पाणीपुरवठा, आपत्कालीन सेवा, आर्थिक सेवा, वीजपुरवठा, करमणूक, मोकळी जागा आदींबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत.
समाजमाध्यमांचा वापर
सर्वेक्षणात मत नोंदविण्यासाठी नागरिकांकडे केवळ चार दिवस उरले आहेत. त्यामुळे अधिकाधिक जनजागृती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप या माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. नगरसेवकांनाही आपल्या विभागांत अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईकरांनी पुढे येऊन आपले मत नोंदवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.