मुंबई / औरंगाबाद - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढत चालला आहे. आता हाच ताण कमी करण्यासाठी अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांच्या संमतीनुसार होम क्वारंटाइन केले जाणार आहे. राज्य सरकारनेच तसा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. परिणामी, अशा रुग्णांवर यापुढे घरीच उपचार करण्यात येतील.
मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांतील महत्त्वाची रुग्णालये भरली असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत आहे. रुग्णालयांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे.
ही काळजी घ्या
प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, ‘‘ लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य वा अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना त्यांच्या संमतीनुसार होम क्वारंटाइनचा पर्याय उपलब्ध करून देता येईल. मात्र, त्यासाठी संबंधित रुग्णांच्या घरी त्यांच्या क्वारंटाइनसाठी तसेच कुटुंबातील व्यक्तींकरिता विलगीकरणासाठी योग्य सुविधा उपलब्ध असाव्यात. घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती हवी. त्याने मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे व ते सतत कार्यरत असेल याविषयी दक्ष राहावे.’’
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
किती दिवस होम क्वारंटाइन?
होम क्वारंटाइन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना कधी मुक्त करावे याविषयीही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला लक्षणे सुरू झाल्याच्या १७ दिवसांनंतर किंवा लक्षणे नसतील तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला असेल तेथून १७ दिवसांनंतर मुक्त करण्यास सांगण्यात आले आहे. मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर होम क्वारंटाइन व्यक्तीस मुक्त करावे. होम क्वारंटाइनचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोविड चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असेही शासनाने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.