Mantralay esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्य सरकारची भन्नाट योजना! आधारकार्ड दाखवून ‘हे’ कार्ड काढा, १२०९ आजारांवर मिळतील ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; सोलापूर राज्यात अव्वल

केंद्र व राज्य सरकारच्या आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेतून प्रत्येकाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. त्यासाठी लाभार्थींकडे गोल्डन कार्ड आवश्यक आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : केंद्र व राज्य सरकारच्या आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेतून प्रत्येकाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. त्यासाठी लाभार्थींकडे गोल्डन कार्ड आवश्यक आहे. गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक तीन लाख २९ हजार आयुष्यमान कार्ड सोलापूर जिल्ह्याने लाभार्थींना दिले असून आतापर्यंत सात लाख ३५ हजार लाभार्थींनी कार्ड काढले आहेत. राज्यात तीन महिन्यात एकूण ९२ लाख ६९ हजार कार्ड काढले असून त्यात सोलापूर जिल्हा अव्वल आहे.

प्रारंभी केवळ दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना ‘आयुष्मान भारत जनआरोग्य योजना’ आता टप्प्याटप्प्याने सर्वांनाच लागू होणार आहे. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे. केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेद्वारे पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जातात. दुसरीकडे राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून तीन लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत होते.

आता या दोन्ही योजना एकत्र केल्या असून दोन्ही योजना मिळून एकच गोल्डन कार्ड देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच शिधापत्रिकाधारक आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवास प्रमाणपत्र असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे ११ लाख ५९ हजार ३५८ तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे ११ लाख ८८ हजार १९७ लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील एकूण २३ लाख ४७ हजार ५५ लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड आरोग्य विभागामार्फत दिले जाणार आहे. आतापर्यंत सात लाख ३५ हजार लाभार्थींनी कार्ड काढले आहे.

सर्वच लाभार्थींना मिळणार कार्ड

गेल्या तीन महिन्यात म्हणजेच १३ सप्टेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत राज्यात एकूण ९२ लाख ५९ हजार ७१४ लाभार्थींनी आयुष्यमान कार्ड काढले आहे. त्यात सर्वाधिक तीन लाख २९ हजार कार्ड लाभार्थींना काढून देण्यात सोलापूर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. उर्वरित लाभार्थींनाही काही दिवसांत कार्ड मिळतील, असे नियोजन केले आहे.

- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर

ग्रामपंचायतीतही कार्ड काढण्याची सोय

जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे, जेणेकरून त्यावर रुग्णाला जिल्ह्यातील ५१ रुग्णालयांमध्ये पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील. लाभार्थींना आपल्या मोबाईलमधूनही कार्ड काढता येते. त्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीतील आपले सरकार सेवा केंद्र तसेच आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने व योजनेतील रुग्णालयांमधील आरोग्य मित्रांच्या मदतीने देखील कार्ड काढता येईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगितले आहे.

कार्डसाठी ‘ही’ कागदपत्रे जरुरी

  • - लाभार्थीचे आधारकार्ड

  • - आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक

  • - कार्ड काढताना लाभार्थी स्वत: पाहिजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT