mumbai-gatewayofindia 
महाराष्ट्र बातम्या

मुंबईत जमावबंदी; कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पाऊल 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने राज्य सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबई शहरात जमावबंदीचा (कलम १४४) आदेश लागू केला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी अनावश्‍यक गर्दी टाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्‍यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र जमण्यावर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख गृह विभागाशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 

राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा आणि पूर्वी दिलेली परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आणि विनाकारण प्रवास न करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे. 

पर्यटन कंपन्यांना देशात आणि परदेशांत समूह सहली काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई दर्शन सहलीही ३१ मार्चपर्यंत थांबविण्यात आल्या आहेत. 

कलम १४४ म्हणजे काय? 
फौजदारी दंड संहितेमधील (१९७३) कलम क्र. १४४ नुसार चार किंवा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी घातली जाते. मोठ्या संख्येने जमाव झाल्यास, त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतल्यास अथवा मानवी जीव आणि आरोग्याला धोका असल्यास हे कलम लागू केले जाते. कोणत्याही भागात दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जमावबंदी करता येत नाही. दोन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा जमावबंदीचा आदेश काढता येतो. नागरिकांच्या जीवित व आरोग्याला धोका आणि दंगलीची शक्‍यता असल्याचे सरकारला वाटल्यास जमावबंदी सहा महिन्यांपर्यंत लागू केली जाऊ शकते. सध्याचे आदेश ३१ मार्चला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT