coronavirus Pune city lockdown time for shops may updated Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

कडक निर्बंध : सकाळी ७ ते ११ या वेळेतच राहणार दुकानं सुरु; आजपासून नवी नियमावली लागू

जाणून घ्या कुठली दुकानं राहणार सुरु, कुठल्या सेवांना असेल दिवसभर परवानगी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई

राज्यात सध्या १ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता संचारबंदीचे नियम अधिक कडक करण्यात आले असून नागरिकांना जास्त वेळ घराबाहेर राहू नये म्हणून अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकानं सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच खुली ठेवण्यात येणार आहेत. आज (२० एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत ती कायम राहणार आहे. राज्य शासनानं या नियमावलींचं अधिकृत पत्राक जाहीर केलं आहे. यानुसार, कुठली दुकानं मर्यादीत काळात सुरु राहतील आणि कुठल्या सेवा दिवसभर सुरु राहतील याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत काय खुलं राहणार?

किराणा दुकानं, भाजीपाला विक्री केंद्र, फळ विक्री केंद्र, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकानं, बेकरी, सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकानं (यामध्ये चिकन, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांचा समावेश), कृषी संबंधीच्या सेवा आणि शेतमालाची दुकानं, पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकानं, पावसाळ्यासंबंधी वस्तूंची दुकानं आणि संस्था या सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत खुली राहतील.

सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु असणाऱ्या सेवा

सध्याच्या संचारबंदीच्या काळात यापूर्वी काढलेल्या शासन आदेशानुसार ज्या घरपोच सेवांना परवानगी देण्यात आली आहे. त्याच सेवा आता नव्या आदेशानुसार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. स्थानिक प्रशासनाला गरजेनुसार यामध्ये बदल करण्याचे अधिकार असतील, असंही नव्या आदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, बाकी इतर सर्व सेवा व वस्तूंची दुकानं पूर्णतः बंद राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET परिक्षार्थींना मोठा दिलासा! परीक्षा पुन्हा होणार; विद्यार्थ्यांना सरकारकडून फी माफ

५ लाखात नीटचा पेपर, ४२ तास आधी हातात! केरळमध्ये फुटला, राजस्थानपर्यंत पोहोचला; ७२० पैकी ६०० गुणांचे प्रश्न जसेच्या तसे

थिएटरनंतर आता ओटीटीवर गाजणार 'अभंग तुकाराम'! या दिवशी होणार ओटीटीवर रिलीज; कुठे पाहाल?

Kalamb ACB Raid: स्पा सेंटरसाठी ‘हप्ता’ मागणारा पोलिस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; ३६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला, कळंबमध्ये मोठी कारवाई!

प्रिया 'ठरलं तर मग'चा निरोप घेणार? कोण साकारणार नवी खलनायिका? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा, म्हणाली, हो...

SCROLL FOR NEXT