CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray Team eSakal
महाराष्ट्र

'उद्धव साहेब...आम्ही ३ हजार खर्च करून आलोय, शेतकऱ्यांच्या मुलांशी खेळू नका'

सकाळ डिजिटल टीम

पुणे : आधीच नोकरी नाही. त्यात मरमर करून परीक्षेचा अभ्यास केलाय. त्यातही परीक्षेच्या केंद्राबाबत प्रवेश पत्रावर माहिती नाही. दोन आणि तीन हजार रुपये खर्च करून बीडवरून पुण्याला आलोय साहेब... तुम्ही अशी वेळेवर परीक्षा रद्द केली. साहेब...आम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहोत. आमच्यासाठी १०० रुपयेही जास्त आहेत. उद्धव ठाकरे साहेब...शेतकऱ्यांच्या मुलांशी असं खेळू नका हो...या संतप्त भावना आहेत, बीड ते पुणे असा सहा तास प्रवास करून आरोग्य विभागाची परीक्षा द्यायला आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या.

आरोग्य विभागाची परीक्षा प्रवेश पत्रामुळे आधीपासूनच चर्चेत होती. अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर केंद्राचे नाव नव्हते, तर कोणाच्या प्रवेश पत्रावर शहराचे नाव नव्हते. तरीही विद्यार्थी परीक्षा देण्यास पोहोचले. मात्र, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता न्यासा कम्युनिकेशनने परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर उमेदवारांच्या हिताचा विचार करत कोणाचेही नुकसान होऊ नये म्हणून गट क मधील जागांसाठीसाठी २५ सप्टेंबर रोजी होणारी आणि गट ड मधील जागांसाठी २६ सप्टेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. पण, यामुळे विद्यार्थ्यांना मनःस्ताप सहन करावा लागलाय.

ब्लॅक लिस्ट कंपनीची निवड कोण करतंय?

'आरोग्य विभागाच्या भरतीसाठी २०२० पासून टेंडर काढलं होतं. त्यामध्ये पाच कंपन्या होत्या. मात्र, पाचवी कंपनी न्यासाची निवड केली होती. पण, ही कंपनी आधापासूनच ब्लॅक लिस्टमध्ये आहे. मग ब्लॅक लिस्ट कंपन्या निवडते कोण? तुम्ही ब्लॅक लिस्ट कंपन्या निवडून भ्रमनिरास करताय. महा-आयटीचे कारभार पाहणारे सतेज बंटी पाटील हा घोळ कोणी घातलाय?' असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी 'साम टीव्ही'सोबत बोलताना उपस्थित केलाय.

परीक्षेचे शुल्क मंत्र्यांच्या घरात जातेय?

२०२० मध्ये जेव्हा परीक्षा घेण्याचे ठरले, त्याचवेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेण्यास तयार होता. मात्र, सरकारने आयोगाचे ऐकले नाही. आयोगाने घेतलेल्या परीक्षा वगळता, सर्वच परीक्षांमध्ये घोळ होतोय. परीक्षेसाठी खासगी कंपन्या विद्यार्थ्यांकडून ज्यादा शुल्क आकारतात आणि तेच पैसे मंत्र्यांच्या घरात जातात, असाही गंभीर आरोप एका विद्यार्थ्याने 'साम टीव्ही'सोबत बोलताना केला.

रात्री ७ वाजता परीक्षा देण्यासाठी पोहोचलो, पण...

साहेब...मी चार तास खर्च करून गडचिरोलीवरून नागपूरला आलो. रात्री ७ वाजता नागपूरला पोहोचलो. राहायचं कुठे हा प्रश्न होता. पण, ती सोय केली आणि ऐनवेळी परीक्षा रद्द केल्या. मी गरीबाचा मुलगा आहे. माझे आर्थिक नुकसान झाले, ते आता कोण भरून देणार? असा सवाल आरोग्य विभागाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याने उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईव्हीएम अन् ओटीपी... वायकर-किर्तीकर मतमोजणी प्रकरणात ECI अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Internet Problem : फोनमध्ये फुल नेटवर्क,पण इंटरनेट चालत नाहीये? पटकन वापरा 'या' ट्रिक्स

Sleepiness In Office : काम भरपूर आहे पण ऑफिसमध्ये सतत येतेय झोप, या छोट्या गोष्टींनी झोप उडेल आकाशी

Pankaja Munde: अन् पंकजा मुंडेंनी हंबरडा फोडला...लोकसभा पराभवामुळे जीवन संपवलेल्या युवकाच्या घरी कल्लोळ!

ZP Teacher Recruitment : चाळीसगाव तालुक्यात शिक्षकांची 38 पदे रिक्त; पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण

SCROLL FOR NEXT