Support by winning the solution to society says CM Fadnavis
Support by winning the solution to society says CM Fadnavis 
महाराष्ट्र

समाजाचे प्रश्न सोडविण्यास विजयामुळे पाठबळ : मुख्यमंत्री 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : "जळगाव आणि सांगलीच्या नागरिकांनी भाजपला अभूतपूर्व यश दिले आहे. जनतेचा कौल आम्ही नम्रतेने स्वीकारतो. या विजयाने वेगवेगळ्या समाजाचे प्रश्‍न, आरक्षण, रोजगार, बेरोजगारी, विकास असे प्रश्‍न सोडवायला नवीन पाठबळ मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

फडणवीस म्हणाले, "आज राज्यात अनेक आंदोलने सुरू आहेत. मोर्चे सुरू आहेत. मागण्या मांडल्या जात आहेत. त्या मागण्या महत्त्वपूर्ण आणि न्यायपूर्ण आहेत. मात्र, महाराष्ट्रातील जनतेला हे माहिती आहे की हे प्रश्न आता नाही. तर गेल्या 40-50 वर्षांत निर्माण होत गेले आहेत. राज्य सरकार हे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, याची जाणीव जनतेला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला विजयी केले आहे.''

ते पुढे म्हणाले, "जळगावात गिरीश महाजन यांनी यशस्वी नेतृत्व केले. राजूमामा भोये आणि नाथाभाऊ खडसे यांनीदेखील खूप परिश्रम घेतले. सांगलीमध्ये पालकमंत्री सुभाष देशमुख, चंद्रकांत पाटील, सांगलीचे आमदार, खासदार यांनीही परिश्रम घेतले. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT