Supriya Sule  sakal
महाराष्ट्र बातम्या

"कोणाच्या वडिलांच्या.."; केतकी चितळे प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हीला १८ मे पर्यंत कोठडी सुनीवण्यात आली आहे. तसेच नाशिकच्या एका तरूणाने शरद पवार यांच्याबद्दल निखिल भामरे नावाच्या तरुणानं आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं, या दोन्ही प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ट्रोलींग हा विषय वेगळा आहे, काही लोकांनी त्यांच्या वॉलवर काहीतरी लिहीलं आहे, ते कायद्यात बसत नाही, जे झालं ते दुर्दैवी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. केतकी चितळे यांच्या पोस्टनंतर राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवर टीका केली होती, यामध्ये देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा समावेश आहे.

यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कोणाच्याही वडिलांच्या मृत्यूची इच्छा करणं गैर आहे, हे कोणत्या संस्कृतीत बसतं. या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. ही कृती आहे त्यावर सातत्य ठेवलं पाहीजे ही मराठी संस्कृती आहे. ही वेळ उद्या कोणावरही येऊ शकते, तुमच्यावर वेळ आली तर मी देखील उभी राहीन असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

केतकी चितळेला ओळखत नाही, असे सांगत केतकी चितळे यांनी मी पोस्ट डिलीट करणार नाही या वक्तव्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तो त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे, देशामध्ये यंत्रणा तेथे जाऊन प्रत्येकानं न्याय मागावा, माध्यम त्यासाठीची जागा नाही. कोणी मरावं असे, अपशब्द काढणं माझ्या संस्कृतीत बसत नाही, माझ्या वडिलांवर ५५ वर्षात इतके हल्ले झाले, त्यांनी कोणाविरोधात शब्द काढला नाही, ही आमची मराठी संस्कृती आहे, ज्याचा आम्हाला आभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुषमा स्वराज यांची आठवण काढत सुप्रिया सुळे महागाही ही कुठल्याही प्रश्नापेक्षा सगळं राजकारण बाजूला ठेवून तातडीने मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यावी आणि महागाईवर राज्य आणि केंद्राने मिळून तो़डगा काढावा अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच नात्यामध्ये भांड्याला भांड लागतंच, या प्रेमाच्या गोष्टी असतात. थोडंस भांड्याला भांड लागणं चांगलं असतं, त्यामुळं नातं घट्ट होतं असं कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील अंतर्गत वादावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT