Raju Shetty  sakal
महाराष्ट्र बातम्या

राजू शेट्टींची मोठी घोषणा; 'स्वाभिमानी' मविआतून बाहेर

शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना विचारलेदेखील जात नाही अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची मोठी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचेही यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आले होते. साताऱ्यातल्या सभेत पवार साहेब यांनी भिजत भिजत सांगितले होते. पवार साहेब भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला. तिन्ही पक्षातील नेत्यांची दिल्लीत भूमिका वेगळी दिसते, मुख्यमंत्री निवडीच्या वेळी सूचक म्हणून मी चालतो, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना साधे विचारलेदेखील जात नाही अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यात केंद्र आणि राज्य अपयशी

शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने उपेक्षीत नागरिकांना उद्ध्वस्त केले आहे. निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभी केली नाही तर, चळवळ टिकावी म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले.

दुधाला देखील हमीभाव द्यावा : राजू शेट्टी

पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, दुधालादेखील हमीभावाच्या कक्षेत आणण्याची मागणी केली आहे. तसेच 24 पिकांव्यतिरिक्त भाजीपाला फळं आणि दुध यांना देखील हमीभावात समावेश करावा अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलीय. 1 मे ला संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभेमध्ये दुधाला हमीभाव देण्याचा ठराव करण्यात यावा, किमान दहा हजार ग्रामपंचायतीमध्ये हा ठराव करण्याविषयी शेट्टींनी मार्गदर्शन केले. जसा असंघटीत कामगारांसाठी किमान वेतन कायदा आहे. तसाच कायदा संसदेने असंघटीत शेतकऱ्यांसाठी करण्याविषयीचा ठराव देखील ग्रामसभेमध्ये करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्याचे सुतोवाच राजू शेट्टींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT