BRS
BRS 
महाराष्ट्र

BRS : ८ दिवसांतून एकदा पाणी, शेतकऱ्यांना वीज नाही, मग विकास कसला? ; केसीआर यांचा शिंदे सरकारला सवाल

Sandip Kapde

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सोमवारी (२६ जून) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर सोलापूरला पोहोचले. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी 600 वाहनांच्या ताफ्यासह येथे पोहोचले आहेत.पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांनी प्रार्थना केली. दरम्यान, त्यांनी आयोजित सभेत संबोधित केले.

के चंद्रशेखर राव म्हणाले, बीआरएसच्या महाराष्ट्रात येण्याने राजकीय पक्षात भितीचे वातावरण आहे. तेलंगणासारखा महाराष्ट्राचा विकास केल्यावर दौरे बंद करेल. बीआरएस तेलंगणा महाराष्ट्र पुरता मर्यादित नाही. तसेच बीआरएस कोणत्या राजीकय पक्षाची टीम नाही तर शेतकऱ्यांची टीम आहे. महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आणा आम्ही विकास करु.

केसीआर यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -

  • बीआरएस महाराष्ट्रात प्रवेशामुळे इतर पक्षात भीतीचं वातावरण आहे. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाने विकास केला नाही.

  • बीआरएस ही शेतकऱ्यांची टीम आहे, कोणत्याही राजकीय पक्षाची टीम नाही

  • सोलापूर आणि औरंगाबादमध्ये ८ दिवसांपासून एकदा पाणी येते, मग विकास कसला झाला, असा प्रश्न केसीआर यांनी उपस्थित केला.

  • बीआरएस हा तेलंगणा आणि महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष नाही

  • महाराष्ट्रात वीज कंपन्यांचे खासगीकरण का केले, तरी देखील शेतकऱ्यांनी वीज का मिळत नाही, असा सवाल देखील केसीआर यांनी उपस्थित केला.

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वीमा योजना का नाही, आम्ही शेतकऱ्यांनी विमा योजना दिली. महाराष्ट्रात शेतकरी एकत्र होत नाही तोपर्यंत काही बदलणार नाही. राजकीय पक्ष येतील आणि जातील.

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वीमा योजना का नाही, आम्ही शेतकऱ्यांनी वीमा योजना दिली. महाराष्ट्रात शेतकरी एकत्र होत नाही तोपर्यंत काही बदलणार नाही. राजकीय पक्ष येतील आणि जातील.

  • तेलंगणासारख्या योजना महारष्ट्रात दिल्यास शेतकऱ्यांची दिवाळी. तेलंगणाच्या योजना महाराष्ट्रात लागू केल्यास दौरे थांबवीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT