arvind sawant 
महाराष्ट्र बातम्या

खोटारड्या लोकांचा खोटेपणा समोर आणला पाहिजे; अरविंद सावंत यांची 'होऊ दे चर्चा'वेळी टीका

रवींद्र देशमुख

मुंबई - देशात इंडिया आघाडी स्थापन झाल्यापासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. त्यातच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. 'होऊ दे चर्चा' या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

अरविंद सावंत म्हणाले की, होऊ दे चर्चा हा उद्धव ठाकरेंनी विषय मला दिला. हा विषय तळागलळाला गेला पाहिजे. खोटारड्या लोकांचा खोटेपणा समोर आणला पाहिजे. लोकशाही खड्ड्यात घालायचा प्रयत्न सुरू आहे.. यासाठी ही गोष्ट सुरू केली आहे.

मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे...महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विषयांवरती बोलतोय.. महाराष्ट्रवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलतोय...शेतकरी उध्वस्त होतय...त्याला धोरण नाही...हे लोकांच्या नजरेला आणावं लागेल, असही सावंत म्हणाले.

कांदा प्रश्नावर सावंत म्हणाले की, केंद्राने निवडणुकीत सांगितलं होतं, हमीभाव देऊ. पण काय झालं? कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. पण आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेला. १०० हून अधिक शेतकरी मरण पावले. त्यानंतर लाज वाटल्याने माफी मागावी लागली. हे विसरू नको. शेतकऱ्यांना उद्वस्त करणारे आणि उद्योगांची भरभराट करणारे कायदे करण्यात येत असल्याचं सावंत यांनी नमूद केलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमध्ये मिळालेल्या मानद डॉक्टरेटबाबत सावंत म्हणाले की, त्यांना आणखी दोन चार मानद देऊन टायकायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

AI Use in Ganeshotsav Crowd गणेशोत्‍सवातील गर्दीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ‘एआय’चा वापर

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Latest Marathi News Updates: निफाड साखर कारखान्याला पिंपळस ग्रामपालिकेडून सील

SCROLL FOR NEXT