flood
flood esakal
महाराष्ट्र

राज्यातील पूरबळींची संख्या १४९ वर; किमान १०० जण बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात पूर आणि दरडी कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १४९ वर पोहोचली आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरु असले तरी अद्यापही किमान १०० जण बेपत्ता आहेत, असे राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागातर्फे सांगण्यात आले आहे. (the number of flood victims in the maharashtra is over 149)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यात पूरग्रस्त ठिकाणांची पाहणी करत सर्वांना मदत करण्याचे आश्‍वासन दिले. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये, तर इतर पूरग्रस्त जिल्ह्यांना ५० लाख रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे.

राज्यातील मृतांची संख्या

६० : रायगड

४१ : सातारा

२१ : रत्नागिरी

१२ : ठाणे

७ : कोल्हापूर

४ : मुंबई उपनगरे

२ : सिंधुदुर्ग

२ : पुणे

पुराचा तडाखा

५० : जण जखमी

१०० : जण बेपत्ता

३२४८ : जनावरांचा मृत्यू

८७५ : गावांना फटका

२,३०,००० : सुरक्षितस्थळी हलवलेले लोक

बचाव पथके

२५ : एनडीआरफ

४ : एसडीआरएफ

२ : तटरक्षक दल

५ : नौदल

३ : लष्कर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT