कृषिप्रधान राज्यात जगाचा पोशिंदा शेतकरी घेतोय गळफास! Canva
महाराष्ट्र बातम्या

कृषिप्रधान राज्यात जगाचा पोशिंदा शेतकरी घेतोय गळफास!

कृषिप्रधान राज्यात जगाचा पोशिंदा शेतकरी घेतोय गळफास!

श्रीनिवास दुध्याल

कोरोनाच्या संकटातही खचून न जाता राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा जगाचा पोशिंदा मागील काही वर्षांपासून हमीभावाच्या प्रतीक्षेतच आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid) संकटातही खचून न जाता राज्याच्या अर्थव्यवस्थेला (Economy) हातभार लावणारा जगाचा पोशिंदा मागील काही वर्षांपासून हमीभावाच्या प्रतीक्षेतच आहे. मागच्या वर्षी अतिवृष्टी (Heavy Rain), महापुराच्या (Flood) नैसर्गिक संकटातून बाहेर पडत असतानाच आता शेती पिकांचे (Crops) दर खूपच घसरले आहेत. त्यामुळे 'जगावे की मरावे' हा प्रश्‍न बळिराजासमोर (Farmer) उभा आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2021 मध्ये एक हजार 605 शेतकऱ्यांनी गळफास घेतल्याची नोंद राज्याच्या मदत विभागाकडे झाली आहे.

गाळप हंगाम संपूनही चार-पाच महिने होऊनही उसाची पूर्ण एफआरपी मिळालेली नाही. दुधाचे दर घसरले असून शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. उत्पन्नाचा खर्च, वाहनाचे भाडेही त्यातून निघत नसल्याने रक्‍ताचे पाणी करून पिकवलेला शेतमाल बांधावर टाकून द्यावा लागत आहे. हमीभावाची प्रतीक्षाच असून दोन लाखांवरील कर्जमाफीचाही लाभ मिळालेला नाही. वीजबिल न भरल्याने कनेक्‍शन कापले जात आहे. बॅंकांच्या कर्जाचा डोक्‍यावरील भार वाढत असून कोरोनामुळे मुले बेरोजगार झाले आहेत. घरात लग्नाला आलेल्या मुलीची चिंता आहे. अतिवृष्टी, पुरात नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊनही पुरेशी मदत मिळालेली नाही. या सर्व बाबींना कंटाळून 2019 मध्ये जगाचा पोशिंदा असलेल्या दोन हजार 808 तर 2020 मध्ये दोन हजार 547 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा यवतमाळ (188), बुलडाणा (180), अमरावती (172), बीड (116), औरंगाबाद (109), वर्धा (102), जळगाव (92) यासह नांदेड, उस्मानाबाद, चंद्रपूर, परभणी, जालना या जिल्ह्यांत सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून दोघांच्या मदतीचे प्रस्ताव नामंजूर झाल्याची माहिती राज्याच्या मदत विभागाने दिली. यावर्षी आत्महत्या केलेल्या एक हजार 605 शेतकरी कुटुंबांपैकी 712 कुटुंबीयांनाच सरकारकडून मदत मिळाली आहे.

विभागनिहाय आत्महत्या (जानेवारी ते ऑगस्ट 2021)

  • अमरावती : 662

  • औरंगाबाद : 532

  • नाशिक : 201

  • नागपूर : 199

  • पुणे : 11

  • कोकण : 00

'मदत'लाच हवीय मनुष्यबळाची मदत

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अजूनही ठोस पाऊल उचलले नाही. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या अनुषंगाने काय नव्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी मदत कार्यालयात कॉल केला. मात्र, त्या ठिकाणी नव्याने बदली होऊन आलेले एकमेव उपसचिव अजूनही रुजू झालेले नाहीत. या विभागाला अव्वर सचिव नाहीत, कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांसह 50 टक्‍क्‍यांहून अधिक पदे रिक्‍त असल्याचे समजले. राज्याचा मदत विभागच पुरेशा मनुष्यबळाच्या प्रतीक्षेत असल्याची स्थिती समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT