solapur city police sakal
महाराष्ट्र बातम्या

शाळेत असताना पाहिले राष्ट्रपतींना भेटण्याचे स्वप्न, आता त्यांचेच पदक मिळाल्याचा आनंद! सोलापूरच्या ‘या’ तिघांना राष्ट्रपती पदक

पोलिस दलात २८ वर्षे गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तसेच सोलापूर शहर पोलिस दलातील विशेष शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) सीमा डोंगरीतोट यांचाही अतिउत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक देऊन सन्मान होणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पोलिस दलात २८ वर्षे गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तसेच सोलापूर शहर पोलिस दलातील विशेष शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) सीमा डोंगरीतोट यांचाही अतिउत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक देऊन सन्मान होणार आहे.

पोलिस दलात काम करताना उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती पदक जाहीर होतात. यंदा सोलापूर शहर पोलिस दलातील दोघांना हे पदक जाहीर झाले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. दोरगे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल हे पदक मिळत आहे. तर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये काम करताना महिलांचे कौटुंबिक वाद मिटवून त्यांचा तुटण्याच्या उंबरठ्यावरील संसार जोडणे, पळून गेलेल्या मुली, महिलांचे समुपदेशन करून त्यांना स्वगृही पाठविण्यात सीमा डोंगरीतोट यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी गुन्हे शाखा, वाचक शाखा व विशेष शाखा येथे त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी ३१ वर्षांपूर्वी पोलिस शिपाई म्हणून पोलिस दलात सेवेला सुरवात केली. सध्या डोंगरीतोट या सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

शाळेत असताना पाहिले राष्ट्रपतींना भेटण्याचे स्वप्न,

आता त्यांचेच पदक मिळाल्याचा आनंद

महाविद्यालयात शिकताना ‘एनसीसी’च्या माध्यमातून दिल्लीतील परेडच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींना भेटण्याची संधी मिळेल अशी आशा होती. पण पोलिस भरतीमुळे तिकडे जाता आले नाही. पण, ते स्वप्न ३१ वर्षांनंतर पदकाच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचा खूप मोठा आनंद आहे. त्यांना भेटण्याचे स्वप्न कायम असल्याचे एएसआय सीमा डोंगरीतोट यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

‘आयपीएस’ विद्या कुलकर्णींनाही राष्ट्रपती पदक

सोलापूर : मूळच्या तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील आयपीएस अधिकारी आणि सध्या चेन्नई येथे ‘सीबीआय’च्या संयुक्त संचालक आणि दक्षिण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या विद्या जयंत कुलकर्णी यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त २५ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक - २०२४ जाहीर झाले आहे. यापूर्वीही त्यांचा २०१५मध्येही राष्ट्रपती पदकाने सन्मान झाला आहे. तमिळनाडू केडरच्या आयपीएस अधिकारी विद्या कुलकर्णी यांना राष्ट्रपती विशेष पदक जाहीर झाले आहे. त्या मूळच्या तिऱ्हे गावच्या आहेत. त्यांचे शिक्षण तिऱ्हे, पंढरपूर, सांगली येथे झाले. १९९८मध्ये त्यांनी आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन १९९९ पासून देशसेवेला सुरवात केली. सहायक पोलिस अधीक्षक, पोलिस अधीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक, पोलिस महानिरीक्षक, चेन्नई क्राईम ब्रॅंच प्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. बढतीवर सध्या त्या संयुक्त संचालक आणि दक्षिण विभाग प्रमुख म्हणून ‘सीबीआय’मध्ये चेन्नईत कार्यरत आहेत. कोइमतूर, उटी, नामकल, पुदुकोटई याठिकाणी त्यांनी पोलिस अधीक्षक म्हणून खूप काम केले. त्या कामावरच त्यांना पुढे वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. कर्तव्यतत्पर, कठोर प्रशासक, कार्यतत्परता या त्रिसूत्रीमुळे या खात्यात त्यांचा नावलौकीक आहे. टाइम मॅनेजमेंट’मध्ये त्यांचा हातखंडा असल्याने नियोजनबद्ध कामावर त्यांनी नेहमीच विशेष भर दिला आहे. त्यांच्या कामाचे कौतुक होत असून त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT