ST Bus Sakal
महाराष्ट्र बातम्या

'ST'कडे 40 हजार अतिरिक्‍त कर्मचारी! तीन पर्यायांतून निघणार मार्ग

एसटी महामंडळाकडे 40 हजार अतिरिक्‍त कर्मचारी! 'या' तीन पर्यायांतून निघणार मार्ग

तात्या लांडगे

गावगाड्यापर्यंत पोचलेली लालपरी अर्थात 'एसटी' आर्थिक संकटाचा सामना करत असून, दीड वर्षात महामंडळातील 27 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

सोलापूर : गावगाड्यापर्यंत पोचलेली लालपरी अर्थात 'एसटी' (ST Bus) आर्थिक संकटाचा सामना करत असून, दीड वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (Maharashtra State Transport Corporation) 27 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे औरंगाबाद (Aurangabad) विभागातील 40 आगार, नागपूर (Nagpur) विभागातील 22, अमरावती (Amravati) विभागातील 26 आगारांची सेवा बंद आहे. राज्यातील 250 आगारांपैकी 108 आगारांची सेवा बंद आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने तीन पर्याय पुढे आणले असून, त्यातून अंतिम मार्ग काढला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे जवळपास 16 हजार एसटी बस असून त्यापैकी केवळ 11 हजार गाड्या मार्गावर धावत आहेत. प्रवाशांची संख्या कमी झाली असून उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होऊ लागला आहे. एसटी महामंडळाकडून राज्य सरकारला दरवर्षी टॅक्‍स स्वरूपात साडेतीन हजार कोटी द्यावे लागतात. त्यामध्ये तिकिटावरील 17.5 टक्‍के टॅक्‍स, इंधनावरील टॅक्‍सचा समावेश आहे. डिझेलचे दर वाढल्याने खर्चात पुन्हा वाढ झाली आहे. कोरोनामुळे दीड वर्ष एसटी सेवा बंद राहिल्याने महामंडळासमोर अडचणी असून मालवाहतुकीतूनही तेवढे उत्पन्न मिळत नाही. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करताना महामंडळ आधिकच आर्थिक गर्तेत सापडले आहे. सध्या महामंडळाकडे 93 हजार कर्मचारी असून जवळपास 40 हजार कर्मचारी अतिरिक्‍त आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी तिन्हीपैकी एक पर्याय निश्‍चित करून मार्ग काढण्याचे धोरण अवलंबल्याचेही सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

राज्य परिवहन महामंडळाची स्थिती...

  • एकूण एसटी बस : 16,300

  • मार्गावरील बसगाड्या : 11,000

  • एकूण कर्मचारी : 93,370

  • दरमहा कर्मचाऱ्यांवरील वेतन खर्च : 350 कोटी

  • अंदाजित अतिरिक्‍त कर्मचारी : 40,000

राज्य सरकारपुढील तीन पर्याय...

  1. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करणे

  2. एसटी महामंडळाकडून राज्य सरकारला मिळणारा टॅक्‍स माफ करणे

  3. राज्य सरकारच्या माध्यमातून अतिरिक्‍त कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना लागू करणे

महामंडळ विलिनीकरण येऊ शकते अंगलट

राज्य परिवहन महामंडळाची बससेवा राज्यातील 92 टक्‍के गावांपर्यंत पोचली आहे. सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरलेली लालपरी अडचणीत सापडली आहे. संचित तोटा वाढला असून उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी अवस्था झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाचा विचार झाला. परंतु, महामंडळाकडील 93 हजार कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये सामील करून घेतल्यास दरमहा एक हजार कोटींचा वेतनावरील खर्च होणार आहे. दरम्यान, विलिनीकरणासाठी दोन्ही सभागृहात ठराव पास करून त्याचा अध्यादेश काढावा लागणार आहे. त्यावेळी एसटी महामंडळाप्रमाणेच राज्यातील इतर 65 महामंडळांपैकी बहुतेक महामंडळे अडचणीत असल्याने त्यांचीही तशी मागणी होऊ शकते. त्यामुळे विलिनीकरणाचा प्रस्ताव बाजूला ठेवून दुसऱ्या पर्यायाचा विचार सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT