Nana Patole on Narendra Modi 
महाराष्ट्र बातम्या

केंद्राच्या पाच दिवसांच्या अधिवेशनात मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न होवू शकतो; नाना पटोलेंचा दावा

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. या आधिवेशनात महत्त्वपूर्ण विधेयक आणण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरून अनेक दावे प्रतिदावे कऱण्यात येत आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे.

काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन कऱण्यात आआहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वात भंडारा शहरात ही यात्रा काढण्यात आली होती. यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं की, देशात एक देश एक निवडणुकीचे काँग्रेस समर्थनच करणार आहे. मात्र ईव्हीएम मशीन बाबतचा संभ्रम दुर केला पाहीजेत. जगाच्या पाठिवर आज सर्वच देशात बॅलेट पेपरवर निवडणुका होतात.

दरम्यान मुंबईला केंद्रशासित करण्याचा आणि महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप करताना नाना पटोले म्हणाले की, केंद्राच्या पाच दिवसाच्या अधिवेशात मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. केंद्राचे हे विशेष अधिवेशन देशाची काय राखरांगोळी करून जाईल, हे आताच सांगता येणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ते म्हणाले की, आरक्षण देण्याचे अधिकार राज्याचे नाही. आता केंद्राचे विशेष अधिवेशन आहे. राज्यातील भाजपचे नेते व मुख्यमंत्री यांनी केंद्राला ५० टक्के आरक्षणाची मर्यादा उठविण्याची मागणी करावी, असंही पटोले यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Yashasvi Jaiswal वर ४ सामन्यांच्या बंदीचे पत्र मॅच रेफरीने लिहून ठेवलं होतं...', अजिंक्य रहाणेचा 'त्या' वादाबद्दल खळबळजनक खुलासा

Pune Crime: किरकोळ कारणावरून वाद अन् थेट हल्ला; मारहाणीत ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू, कोलदऱ्यात किरकोळ वादाचा थरारक शेवट

Godavari River: गंगापूरच्या अमळनेर वस्तीत हृदयद्रावक घटना; गोदावरीच्या पुराच्या पाण्यात बहीण-भावाचा बुडून मृत्यू

JPSC Student Protest: विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढला, JPSC च्या ३ सदस्यांचा राजीनामा; झारखंडमध्ये मोठी घडामोड

बुमराह, साई सुदर्शनसह स्टार्स दुखापतग्रस्त; VVS Laxman यांचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, 'CoE केवळ रिहॅब सेंटर नाही, तर...'

SCROLL FOR NEXT