Nitin Raut 
महाराष्ट्र बातम्या

राज्यावर पुन्हा भारनियमनाचे संकट; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले संकेत

उन्हाळा सुरू झाल्याने विजेच्या मागणीत प्रचंड वाढ

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्यात पुन्हा एकदा भारनियमनाचे संकट येऊ शकते. एक ते दीड दिवस पुरेल एवढाच कोळसा औष्णिक वीज उत्पादन केंद्रांमध्ये शिल्लक असल्याने उत्पादन वीजेची निर्मिती घटण्याची शक्यता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली.

दोन दिवसांच्या अकोला जिल्हा दौऱ्यावर असलेले ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना विजेच्या भारनियमनाच्या संकटाचे संकेत दिले. ‘‘उन्हाळा सुरू झाल्याने विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्या तुलनेत वीज उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक तेवढा कोळसा वीज उत्पादन केंद्रांकडे उपलब्ध नाही. एक ते दीड दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक असल्याने वीज उत्पादनात घट होऊ शकते. वीज उत्पादन घटल्यास राज्यात भारनियमन करावे लागू शकते,’’ असे ऊर्जामंत्री म्हणाले. कोळशासाठी सातत्याने संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहोत. मात्र, परिस्थितीत बदल न झाल्यास भारनियमन अटळ असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagannath Puri: जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर घारींचा थवा; स्थानिकांनी ओळखला धोक्याचा इशारा, 'ती' भविष्यवाणी...

Latest Marathi News Live Update: तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा विधानभवनाकडे मोर्चा

Dhurandhar Movie Location: धुरंधर चित्रपटाची लोकेशन करा एक्सप्लोर आणि बजेटमध्ये ट्रिपचा अनुभव घ्या...

Mumbai Metro: कल्याण-डोंबिवलीत मेट्रो कामांना वेग गती! शंभराव्या गर्डरची उभारणी

Promo : समर-स्वानंदी हळूहळू एकमेकांच्या पडतायेत प्रेमात ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता माती खाऊ नका"

SCROLL FOR NEXT