Gulabrao Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Gulabrao Patil : पाच वर्षांत तीन शपथविधी, तीनही वेळा आपण उपस्थित; गुलाबराव पाटलांचं विधान

रवींद्र देशमुख

जळगाव - २०१९ च्या विधासनभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा राजकारणात धक्कादायक घडामोडी घडल्या. आधी अजित पवार-देवेंद्र फडणवीसांचं सरकार, त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आणि आता शिंदे-फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. त्यात आता अजित पवारांची एंट्री झाली. यावरून शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक विधान केलं.

गुलाबराव पाटील म्हणाले की, पाच वर्षांत सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी तीनही टाईम शपथविधी झाले. या तीनही वेळा मी त्या ठिकाणी उपस्थित होतो, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिरपूर येथील एका कार्यक्रमादरम्यान केले आहे.

ते पुढं म्हणाले की, पाच वर्षांत अशी कोणतीच पार्टी नाही की जिने सरकार चालवलं नाही. मात्र 35 वर्ष ज्यांच्याबरोबर काढली, त्यांना सोडून दुसऱ्यांसोबत जाऊन त्यांचा देखील विश्वास संपादन करणे हे आपल्यासारख्या माणसासाठी फार कठीण काम होत, असंही मंत्री पाटील यांनी म्हटलं.

विद्यार्थ्यांचं आणि आमचं सारखंच आहे असे म्हणत, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसारखं आम्हाला देखील नापास झालं तर पाच वर्ष थांबावं लागतं. 17 नंबरचा फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागते. त्यातही जमलं नाही तर, चाललं आपल्या घरी, अशी परिस्थिती असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT