solapur mahapalika sakal
महाराष्ट्र बातम्या

उजनीवरील महापालिकेचे तिबार पंपिंग बंद! अधिकाऱ्यांच्या हुशारीमुळे 65 लाखांची बचत; औज बंधाऱ्यात 2 महिने पुरेल इतके पाणी; वन विभागाचे अधिकारी आज सोलापुरात

पाकणी येथील महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र वन विभागाच्याच जागेत असून त्याला परवानगीच नाही. आता पुन्हा वन विभागाच्याच ३ हेक्टर जागेत नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी सहा हेक्टर जमीन मिळावी, असा प्रस्ताव वन विभागाला सादर करण्यात आला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मृग नक्षत्राचा पाऊस झाल्याने उणे ६० टक्क्यांवरील उजनी धरण आता उणे ४८ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे महापालिकेचे धरणावरील तिबार पंपिंग सोमवारी (ता. १७) बंद करण्यात आले आहे. तिबार पंपिंगची निविदा १.३२ कोटींची होती आणि मक्तेदाराला एक महिन्यासाठी निम्मी रक्कम दिली होती. पण, त्यानंतर पुढील दोन महिन्याची रक्कम दिवसाला देण्याचे ठरले होते. आता १० दिवसांत पावणेसात टीएमसी पाणी आल्याने महापालिकेचे तब्बल ६५ लाख रुपयांची बचत झाली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात उजनी धरण सर्वात निच्चांकी पातळीवर (उणे ६० टक्के) पोचले होते. त्यामुळे महापालिकेला शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दुबार पंपिंगसाठी जवळपास एक कोटींचा खर्च करावा लागला तर तिबार पंपिंगसाठी एक कोटी ३२ लाख रुपयांची निविदा काढावी लागली. अधिकाऱ्यांच्या दूरदृष्टीमुळे तिबार पंपिंगचे ६५ लाख रुपये वाचले आहेत. धरण आता उणे ३५ टक्क्यांवर आल्यावर दुबार पंपिंगदेखील बंद होणार आहे. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणारे औज-चिंचपूर हे बंधारे पावसामुळे सध्या फुल्ल आहेत. त्यात सध्या ५५ ते ६० दिवस पुरेल पाणी इतके पाणी आहे. दुसरीकडे हिप्परगा तलावात देखील दीड फूट पाणी वाढल्याची माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली.

नागपूरचे वन अधिकारी आज सोलापुरात; महापालिकेने मागितली ६ हेक्टर जमीन

महापालिकेच्या वतीने सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीचे काम सुरू असून आतापर्यंत ९० किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. आता देवडी, पाकणी व हिवरे या परिसरातील वन विभागाच्या जागेतून पाइपलाइन जाणार असल्याने त्याची स्थळ पाहणी करायला नागपूरच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी उद्या (मंगळवारी) सोलापुरात येणार आहेत. दरम्यान, पाकणी येथील महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र वन विभागाच्याच जागेत असून त्याला परवानगीच नाही. आता पुन्हा वन विभागाच्याच ३ हेक्टर जागेत १८ कोटींचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर एकूण सहा हेक्टर जमीन मिळावी, असा प्रस्ताव वन विभागाला सादर करण्यात आला आहे. त्याबदल्यात वन विभागाला आंधळगाव (ता. मंगळवेढा) येथील पर्यायी जमीन जिल्हा प्रशासनाकडून दिली जाणार आहे. नवीन बदलानुसार आता जेवढी वन विभागाची जमीन घेतली जाईल, तेवढीच पर्यायी जमीन या विभागाला द्यावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?

गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूचं गुढं उलगडलं, स्कुबा डायव्हिंग नाही तर हे होतं मोठं मृत्यूचं कारण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा ‘Azad Kashmir’चा नारा; माफी मागायची सोडून आपलीच टिमकी मिरवतेय...

'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा

Kantara Chapter 1 Box Office : 'कांतारा चॅप्टर 1' वादळ! पहिल्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई, छावा-सैयारासह 10 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT