मुंबई : फेसबूक लाईव्ह करुन आत्महत्या केलेल्या पंढरपूरमधील सूरज जाधव या शेतकऱ्याचा मुद्दा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी लक्षवेधीद्वारे विधानसभेत मांडला. यावेळी त्यांनी सराकरवर अनेक गंभीर आरोप केले. या सरकारमुळं शेतकऱ्यांवर आता फेसबुक लाईव्हद्वारे आत्महत्येची वेळ अल्याचंही ते यावेळी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज कापणं याक्षणी बंद करा, अशी मागणीही त्यांनी केली. (Time for farmers to commit suicide via Facebook Live Fadnavis attack MVA govt)
फडणवीस म्हणाले, "सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या मगरवाडी इथं सूरज जाधव या शेतकऱ्यानं ४ मार्च रोजी फेसबुक लाईव्ह करुन गोळ्या खाऊन आत्महत्या केली. या शेतकऱ्यानं व्हिडिओत म्हटलं की, मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाही. कारण शेतकरी असमर्थ दुबळा असतो. या सरकारला शेतकऱ्याची काळजी नाही. त्यानं शेतकरी धोरणांचा निषेध करतो असं म्हटलं. मी त्याच्या घरच्यांशी बोललो. तेव्हा हे कळलं की, पाणी द्यायची वेळ असताना त्यांच्या शेतीपंपाच कनेक्शन कापण्यात आलं. आपण रोज शेतीपंपाचं कनेक्शन कापतो आहोत. आज एकानं केली अनेकही आत्महत्या करायला तयार असतील"
या सरकारला काय झालंय? या सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांचं वीजमंत्री ऐकत नाहीत. सुलतानी पद्धतीनं शेतीपंपांची वीज कापली जात आहे. किमान सूरज जाधव प्रकरणातून धडा घेत वीजपंपांची वीज कापण्याची मोहिम सरकारनं ताबडतोब थांबवावी. माझी विनंती आहे की, कृषी पंपाची वीज कापणं याक्षणी तात्काळ बंद करा, अशी मागमी फडणवीस यांनी विधानसभेत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.