उदयनराजे भोसले ,अजित पवार  Google
महाराष्ट्र बातम्या

जे पेरले तेच उगवले; अजित पवारांवर उदयनराजेंचे टीकास्त्र

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जे जे देश प्रगत झाले तेथे शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून दिली गेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र अजूनही तसेच आहेत. याबाबत कोणतेही राजकारण न करता शासनाला शेतकऱ्यांना मदतीची सुबुद्धी दे, असे साकडे करवीर निवासिनी श्री अंबाबाईला घातल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले (UdayanRaje Bhosale) यांनी दिली. आज दुपारी त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

उदयनराजे म्हणाले, ‘‘निवडणुका आल्या की राज्यकर्त्यांना शेतीप्रधान देश आणि शेतकऱ्यांची आठवण येते. बेंबीच्या देठापासून त्यांना न्याय हक्क देण्याची भाषा बोलली जाते आणि नंतर मात्र शेतकऱ्यांचा राज्यकर्त्यांना विसर पडतो. दोषी असणारा कुणीही असो. त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. बंद करून कधीच सुटत नाहीत. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गट-तट विसरून प्रयत्न झाले पाहिजेत.’’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील प्राप्तिकरच्या कारवाईबाबत बोलताना त्यांनी जे पेरले तेच उगवले, अशी टीका केली. जनतेचा पैसा जनतेकडेच गेला पाहिजे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी चुकीच्या हातात मराठा आरक्षणाची मशाल असल्याचे सांगून जातनिहाय जनगणना करून तत्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT