Sharad Pawar Uddhav Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : "उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही"

चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

वैष्णवी कारंजकर

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी गौतम अदानी प्रकरण आणि त्याबद्दलच्या आपल्या विधानाबद्दलही भाष्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांच्या या विधानाबद्दलचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. या वृत्तानुसार, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही, त्यांनी इतर पक्षांना विचारात घ्यायला हवं होतं, अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

पवार म्हणाले, "मुख्यमंत्रीपद तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन त्यांच्या संख्येवरुन ठरलं होतं. यामध्ये तिन्ही पक्ष सहभागी होते. जर कोणाला वेगळा निर्णय घ्यायचा असेल, राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांसोबत संवाद करणं गरजेचं होतं. चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: सरकारी जमिनीवरील गृहनिर्माण संस्थाच्या स्वयंपुनर्विकासाला गती देणार - बावनकुळे

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

SCROLL FOR NEXT