uddhav thackeray question to the Center government; Will the rent's government hire tomorrow
uddhav thackeray question to the Center government; Will the rent's government hire tomorrow uddhav thackeray question to the Center government; Will the rent's government hire tomorrow
महाराष्ट्र

"उद्या भाडोत्री सरकारही आणणार का?" 'अग्निपथ'वरून CM ठाकरेंचा केंद्राला टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मागील काही दिवसांपासून अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर हल्ला केला जात आहे. या योजनेच्या विरोधात निर्दशने केली जात आहे. योजनेविरुद्ध टीका करण्यात मुख्यमंत्रीही मागे राहिलेले नाही. सैनिकांना चार वर्षांसाठी भाडेतत्वावर घेत आहात. उद्या चालून भाडोत्री सरकारही आणणार का, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केंद्र सरकारवर (Central government) लगावला. (uddhav thackeray question to the Center government; Will the rent's government hire tomorrow)

मुंबईत आयोजित शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. उमेदीच्या वयात देशातील तरुणांना मोठे स्वप्न दाखवायचे. त्यांना त्याच्या मागे धावायला लावायचे. चार वर्षांनंतर त्यांचे काय, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केला.

आज भाड्यावर सैनिक घेत आहात. उद्या भाडोत्री राज्यकर्ते आणणार का? भाडोत्री सरकार आणणार का? मुख्यमंत्री पाहिजे, पंतप्रधान पाहिजे असे टेंडर काढणार का? नाहीतरी दर पाच वर्षांनी नागरिकांना मते मागाला जावचं लागते, असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी हाणला.

केंद्र सरकारने (Central government) देशातील नागरिकांना दरवर्षी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन सरकारने पाळले नाही. आता अग्निपथ योजनेची घोषणा करून युवकांशी खेळले जात आहे. फक्त नावच मोठे दिले आहे. काम मात्र सुतार काम व वाहन चालकाचे करावे लागणार आहे. कोणत्या योजनेला कोणते नाव देताहेत याचाही विचार करीत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दहा टक्के आरक्षणानी काय होणार?

१७ ते २१ या उमेदीचा वयात तरुणांना कंत्राटी काम देण्याची योजना सरकारने आखली आहे. उमेदीच्या वयाच त्यांच्याशी खेळले जात आहे. चार वर्षांनी १० टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. दहा टक्के आरक्षणानी काय होणार आहे. उर्वरित तरुणांनी उमेदीचा काळ सेनेला दिल्यानंतर त्यांनी काय करावे, असा प्रश्नही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केंद्र सरकारला विचारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

RBI : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला मिळणार सर्वोच्च लाभांश

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

Water Supply : हरियाना सरकारने रोखले दिल्लीचे पाणी; आतिशी मार्लेना यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT