Uddhav Thackeray and Eknth Shinde
Uddhav Thackeray and Eknth Shinde 
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : ...तर जीभ हासडून टाकू; उद्धव ठाकरेंचा थेट CM शिंदेंना इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.

एसटीची गैरसोय होते आहे. लाज वाटत नाही आता स्वताचा हसरा चेहरा तिकडे लावला आहे. माझं कुटूंब माझी जबाबदारी हे मी म्हणत आलो आणि तो शब्द पाळला. ज्या गतीनं तुम्ही कुटूंब बदलता आहात हे काही बरोबर नाही.

कोकणातील रस्ते बदलण्याविषयी काही सुचना केल्या होत्या. पर्यटकाला उद्योजकाचा दर्जा दिला. त्योक्ते वादळाच्यावेळी मी पाहणी केली. आमच्या सरकारनं सगळ्यांना मदत केली होती. अनेकांना आधार दिला होता. कितीतरी कामं मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हालाच माहिती आहे. पण माशी शिंकली कुठे...असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

राजन साळवी काय देशद्रोही आहे का, काल परवा मिंधे बोलले की, बरं झालं आमचं देशद्रोहयाबरोबरचं चहापान टळलं, असं बोलणाऱ्यांची जीभ हासडून टाकू, मुंबई वाचवणारे शिवसैनिक तुम्हाला देशद्रोही वाटतात का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बर झालं देशद्रोह्यांसोबत चहापान टळलं, असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT