The UGC meeting decided to start the college from November 
महाराष्ट्र बातम्या

नोव्होंबरपासून कॉलेज सुरु करण्याचा निर्णय; युजीसीच्या बैठकीत निर्णय?

अशोक मुरुमकर

अहमदनगर : विद्यापीठ व महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरु करावे, असा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत झाला आहे, असे समजतंय. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. ‘साम टीव्ही’च्या वृत्तानुसार, जेईई- नीट परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी (मंगळवारी) रात्री उशिरा मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत विद्यापीठ व महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे असा निर्णय घेण्यात आला. दिल्ली विद्यापीठात ओपन बुक परीक्षा १५ ऑगस्टनंतर होणार आहे. तसंच विद्यापीठांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्ण करून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला आहे. अद्याप दहावी व बारावीच्या परीक्षेचे निकाल लागलेले नाहीत. नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यांचे शाळा अद्याप सुरु झालेल्या नाहती.
विद्यापीठांच्या अंतिम परीक्षेच्या निर्णयावरुन राज्यात गोंधळाची स्थिती आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या संसर्गाचा धोका पाहता परीक्षा न घेण्याची भूमिका घेतील आहे, तर यूजीसीने राज्यांना परीक्षा घेण्याबाबत पत्र पाठवलं आहे. यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात त्यांनी महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि परीक्षांसाठीची संसाधने याबाबत लिहित सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT