महाराष्ट्र

Accident : नवरदेवाच्या गाडीने नाचणाऱ्या 12 वऱ्हाडींना चिरडलं; मुंबईजवळच्या घटनेने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः नवरदेवाच्या गाडीसमोर वऱ्हाडी नाचत होते. थार गाडीसमोर नाचणाऱ्यांना चक्क त्याच गाडीने चिरडले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली.

उल्हासनगरच्या शांती नगरमध्ये ही घटना घडली आहे. यामध्ये १२ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. त्यातील २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

ठाण्यातल्या उल्हासनगरमध्ये एक लग्नसमारंभ पार पडत होता. सगळं उत्साहाचं वातावरण होतं. नवरदेव थार गाडीमध्ये होता. नवरदेसामोर वऱ्हाडी मंडळी नाचत होते.

अचानकपणे थार गाडीने पिकअप घेतलं आणि नाचणाऱ्या वऱ्हाडींना चिरडलं. या घटनेत १२ जण जखमी झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या घटनेनंतर पोलिसांनी थार गाडी ताब्यात घेतली. नेमका अपघात कसा घडला, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. या घटनेनंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. जखमींमध्ये बहूतांश महिलांचा समावेश असून गाडी अॅटोमॅटिक असल्याचं सांगितलं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Brijbhushan Singh : ...तर ब्रिजभूषण सिंह काँग्रेसमध्ये दिसले असते, सोनिया गांधींची होती संमती; स्वतःच सांगितला किस्सा

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT