Nitin-Gadkari 
महाराष्ट्र बातम्या

"एमएसएमई' लवकरच सुरू करणार ही योजना, नितीन गडकरींनी केली घोषणा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एमएसएमई ही केंद्राची संस्था लवकरच स्टॉक एक्‍सचेंज सुरू करणार असून देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांना यात आपला पैसा गुंतवता येईल. तसेच सर्वसामान्य माणूसही एमएसएमईचे शेअर खरेदी करून गुंतवणूक करू शकेल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

"महाबीझ'च्या पदाधिकाऱ्यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरमने हा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. विमा आणि शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी सध्या असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, उच्च प्रगती करणाऱ्या एमएसएमई उद्योगांना शासनाकडून रेटिंग मिळेल आणि शासनही 15 टक्के भागभांडवल उपलब्ध करून देईल. ऍमेझॉनसारखे "ई मार्केट प्लेस' ही एमएसएमई तयार करीत आहे. कोरोनामुळे त्याला वेळ लागणार आहे. पण, हे संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर ऑनलाईन व्यवहार लोकांना करता येतील, असेही गडकरी म्हणाले. 
 

आत्मनिर्भर पॅकेजमध्ये 3 लाख कोटी बजेट एमएसएमईला मिळाले. याचा फायदा 45 लाख एमएसएमई उद्योगांना होणार आहे. फंड ऑफ फंडच्या माध्यमातून 50 हजार कोटींचे इक्विटी इनफ्यूजन, जे एमएसएमई उद्योग जलद गतीने प्रगती करीत आहेत. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीसाठी हा योग्य काळ आहे. सध्या या क्षेत्राची स्थिती चांगली असून मागील 5 वर्षात आपण 17 लाख कोटींची कामे या क्षेत्राला दिली आहे. ऍग्रो एमएसएमईच्या संकल्पनेतून ग्रामीण भागात, जंगल क्षेत्रात आणि आदिवासी भागात उद्योग नेऊन या भागाचा विकास करण्याची संकल्पना यावेळी गडकरी यांनी मांडली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT