UPSC
UPSC 
महाराष्ट्र

'यूपीएससी'च्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा केंद्राबाबत आयोगाचा मोठा निर्णय!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) परीक्षा केंद्र बदलण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी देशभरातील विद्यार्थी करत असल्याने अखेर त्याची दखल घेण्यात आली आहे. दोन टप्प्यात केंद्र बदलण्यासाठी लिंक ओपन असणार आहे. तसेच जागेच्या उपलब्धेनुसार परीक्षा केंद्र मिळणार आहे. 

७ ते १३ जुलै आणि २० ते २४ जुलै या दरम्यान उमेदवारांना केंद्र बदलता येणार असून, सर्वांत आधी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सर्वांत आधी केंद्र बदलून मिळणार आहे. जो सर्वात आधी अर्ज करेल त्याला आधी केंद्र बदलून मिळणार आहे. 

यूपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा आणि वनसेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. लाॅकडाऊन काळात अनेक विद्यार्थी दिल्ली सोडून त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. त्यामुळे त्यांनी परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्याची मागणी केली होती. त्यास आयोगाने मान्यता दिली आहे. 

यामध्ये परीक्षा केंद्रांची उपलब्ध किती आहे, क्षमता किती आहे याचा विचार केला जाणार असून, त्यानंतर किती  उमोदवारांच्या अर्जांना मान्यता दिली जाईल. 

केंद्र बदलण्यासाठी ७ ते १३ जुलै आणि २० ते २४ जुलै अशा दोन टप्प्यांत उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. केंद्राची क्षमता पूर्ण झाल्यास ते केंद्र मिळणार नाही. तसेच १ ते ८ ऑगस्ट दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेणार आहे. मात्र एकदा अर्ज मागे घेतल्यास तो पुन्हा भरता येणार नाही. या संदर्भातील सविस्तर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT