varsha gaikwad 
महाराष्ट्र बातम्या

दहावीसाठी नवी मूल्यमापन पद्धत; वर्षा गायकवाडांची घोषणा

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षांबाबत पत्रकार परिषद घेतली. विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षांबाबत पत्रकार परिषद घेतली. विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. 2021 साठी दहावीचे निकाल खाली प्रमाणे लावले जातील. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयांचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार आहे. लेखी मूल्यमापनासाठी 30 मार्क असतील, गृहपाठ, प्रात्यक्षिकेच्या आधारावर 20 मार्क आणि 9 वीच्या परीक्षेतील गुणांच्या आधारे 50 मार्क असतील. तसेच ज्यांना कोरोना काळात परीक्षा ज्यांना द्यायचं नाही, त्यांना पुढील दोन वर्षात परीक्षा देता येतील. (varsha gaikwad 10 exam New assessment method for X Announced)

विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयांचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत लेखी परीक्षेला तीस गुण दिले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा याच्या आधारे 20 गुण दिले जातील. विद्यार्थ्यांच्या नववीच्या निकालाच्या आधारे 50 गुण दिले जाणार आहे. तसेच या मूल्यमापनावर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना दोन वेळा पुन्हा परीक्षा देता येईल, असं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं.

विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकाच्या अध्यक्षेतेखाली 7 सदस्यीय निकाल समिती असेल. ही निकालाची पडताळणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. तसेच शाळा स्तरावर काही गैरप्रकार झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. मंडळामार्फत जून अखेर निकाल घोषित करण्याचा मानस आहे. यासाठी मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल. शाळांचा याचं तंतोतंत पालन करावं लागेल, असं शिक्षणमंत्री म्हणाल्या..

दहावीचे मूल्यमापन आणि अकरावीचे प्रवेश याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता असं स्पष्ट करतानाच ज्यांना गूण समाधानकारक वाटत नाही त्यांच्यासाठी दोन पर्याय असतील, असे गायकवाड यांनी सांगितले. जून महिन्याच्या अखेरीस दहावीचा निकाल जाहीर करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शाळा स्तरावर गैरप्रकार झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT