varsha gaikwad
varsha gaikwad 
महाराष्ट्र

दहावीसाठी नवी मूल्यमापन पद्धत; वर्षा गायकवाडांची घोषणा

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षांबाबत पत्रकार परिषद घेतली. विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षांबाबत पत्रकार परिषद घेतली. विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. 2021 साठी दहावीचे निकाल खाली प्रमाणे लावले जातील. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयांचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार आहे. लेखी मूल्यमापनासाठी 30 मार्क असतील, गृहपाठ, प्रात्यक्षिकेच्या आधारावर 20 मार्क आणि 9 वीच्या परीक्षेतील गुणांच्या आधारे 50 मार्क असतील. तसेच ज्यांना कोरोना काळात परीक्षा ज्यांना द्यायचं नाही, त्यांना पुढील दोन वर्षात परीक्षा देता येतील. (varsha gaikwad 10 exam New assessment method for X Announced)

विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयांचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत लेखी परीक्षेला तीस गुण दिले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा याच्या आधारे 20 गुण दिले जातील. विद्यार्थ्यांच्या नववीच्या निकालाच्या आधारे 50 गुण दिले जाणार आहे. तसेच या मूल्यमापनावर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना दोन वेळा पुन्हा परीक्षा देता येईल, असं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं.

विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकाच्या अध्यक्षेतेखाली 7 सदस्यीय निकाल समिती असेल. ही निकालाची पडताळणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. तसेच शाळा स्तरावर काही गैरप्रकार झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. मंडळामार्फत जून अखेर निकाल घोषित करण्याचा मानस आहे. यासाठी मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल. शाळांचा याचं तंतोतंत पालन करावं लागेल, असं शिक्षणमंत्री म्हणाल्या..

दहावीचे मूल्यमापन आणि अकरावीचे प्रवेश याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता असं स्पष्ट करतानाच ज्यांना गूण समाधानकारक वाटत नाही त्यांच्यासाठी दोन पर्याय असतील, असे गायकवाड यांनी सांगितले. जून महिन्याच्या अखेरीस दहावीचा निकाल जाहीर करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शाळा स्तरावर गैरप्रकार झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT