school fees sakal media
महाराष्ट्र बातम्या

"कोरोनात अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क माफ करा"

ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकुर्णी यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

संजीव भागवत

मुंबई : कोरेानामुळे (corona) राज्यात मागील दोन वर्षात तब्बल २५ हजार ६८१ मुले ही अनाथ (orphan student) झाली आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क (education fees) आणि सध्या सुरू असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेचे परीक्षा शुल्क (ssc and hsc exam fees) माफ करावा. त्यासाठी स्पष्ट आदेश काढावेत अशी मागणी ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकुर्णी (heramb Kulkarni) यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना एक पत्र लिहून केली आहे.

राज्यात सध्या राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात कोरोनात महाराष्ट्रात मृत्यू झालेल्या कुटुंबाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. दवाखान्याच्या खर्चाने अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली व असंघटित क्षेत्रातील गरीब कुटुंबांची ही संख्या लक्षणीय आहे. यासाठी किमान या कुटुंबातील विद्यार्थ्यांची दहावी-बारावीच्या परीक्षेचे परीक्षा शुल्क माफ करावी अशी विनंती कुलकुर्णी यांनी केली आहे.

शिक्षण विभागाने  कोरोनात पालक गमावलेल्या पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली असून ती संख्या सरकारकडे आहे. या विद्यार्थ्यांची सरकारने फी त्वरित माफ करावी. त्याच बरोबर पहिली ते वी आठवीपर्यंतच शालेय पोषण आहार, गणवेश व मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात ती देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

शालेय खर्चासाठी प्रोत्साहनपर रक्कम द्या

राज्यात शिक्षण घेत असलेल्या नववी ते बारावीला या योजनांचा लाभ मिळत नसल्याने नववी ते बारावीपर्यंत शिक्षणाचा खर्च खूप वाढतो. हा खर्च करणे विधवा महिलांना खूप कठीण होते आहे. महाग पाठ्यपुस्तके स्वतः खरेदी करावी लागतात. अशा विधवा महिलांच्या मुलांना शालेय इतर खर्चासाठी विशिष्ट रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्याची आवश्यकता आहे. त्यातून हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

वेगळ्या शिष्यवृत्तीची आवश्यकता

मागील वर्षांत अनाथ झालेली असंख्य मुले ही कठीण आर्थिक स्थितीमुळे बालमजुरीकडे वळली आहेत व अनेक मुली बालविवाहाला बळी पडल्या आहेत. त्यामुळे नववी ते बारावीच्या इयत्तेतील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रवाहात टिकून राहण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज वाटते. सर्वच एकल व विधवा महिलांच्या मुलांसाठी शासनाने असा दृष्टिकोन घ्यायला हवा व शुल्क माफी व प्रोत्साहनपर मदत आणि पालक गमावेलेल्या मुलांसाठी वेगळी शिष्यवृत्ती जाहीर करावी अशी मागणीही कुलकर्णी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT